rain
rain e sakal
कोकण

कोकणाला 2 दिवस रेड अलर्ट ; 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

राजेश कळंबटे/

रत्नागिरी : गेले सहा दिवस झाले रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यास पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. बहुतांश सखल भागात पाणी साचल्याने ग्रामस्थांना त्रास झाला. काही भागातील भात शेती देखील पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. पावसाचा जोर कमी असल्याने आता सखल भागातील पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे. (ratnagiri-sindhudurg-red-alert-warning-24-hours-heavy-rain-konkan-rain-update-akb84)

दरम्यान पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे कोकणातील शेतकरी भात शेतीचे नुकसान होईल की काय या चिंतेत पडले आहेत. सततच्या पडणा-या पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध अशा पावसमधील सखल भागात देखील पाणी शिरलं होते. गौतमी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. परिणामी, समाधी मार्गावरील सखल भागात पाणी शिरलं. मुसळधार पावसानं गौतमी नदी ओसंडून वाहत आहे. सध्या पावसानं उसंत घेतली असून सखल भागातील पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे.

सध्या रिमझिम स्वरूपाचा जिल्ह्याच्या काही भागात पाहायला मिळत आहे. फुणगूस येथील शास्त्री खाडीने नेहमीच्या पाण्याची पातळी ओलांडल्याने खाडीपट्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण खाडीभागाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. खाडीलगत असलेल्या दहा ते बारा गावातील भात शेतीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांना शेतीचे कामे अर्धवट सोडून घरचा मार्ग पत्करावा लागला आहे.शेतात काढून ठेवलेल्या भाताची रोपं शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेलीत. फुणगूस बाजारपेठेत सुमारे तीन ते चार फूट पाणी होते. दत्तमंदिर नदीला ही मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येऊन तेथील घराजवळ व भातशेतीत पाणी घुसले होते. संपूर्ण जनजीवनच विस्कळीत होते. आता पाऊस कमी झाल्यानं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.

रत्नागिरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टेंभेपूल भागातील सखल भागात पाणी शिरले आहे. पावसामुळे काजळी नदीला पूर आला आहे. नदीचं पाणी आसपासच्या सखल भागात शिरले आहे. यावेळी टेंभेपूल भागातील समाजमंदिर भागापर्यंत पाणी शिरलं होतं. सध्या पावसानं विश्रांती घेतली असून नदीचा पूर ओसरला असून सखल भागात साचलेलं पाणी देखील आता ओसरायला सुरूवात झाली आहे.

कोकणाला पुढील 2 दिवस रेड अलर्ट

कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. येथे पडणाऱ्या सततच्या पावसाने कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग, देवगड, वैभववाडी या भागात पावसामुळे पाणी साचले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1323.91 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील 2 दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT