Sari virus patients doubled in seven days 116 injured 13 deaths clear in ratnagiri from report 
कोकण

कोरोनानंतर सारीचे आक्रमण : सात दिवसांत या रोगाचे रुग्ण झाले दुप्पट : १३ जणांचा मृत्यू...

अर्चना बनगे

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना कोरोनासोबत आता ‘सारी’ तापाचा धसका अनेकांनी घेतला आहे. सारी तापाचे रुग्ण आठवड्यात दुपटीपेक्षा अधिक वाढले आहेत. आतापर्यंत ११६ जणांना सारीची लागण झाली आहे तर आतापर्यंत या रोगाने १३ बळी घेतल्याने कोरोनापाठोपाठ सारीवर मात करण्याचे आव्हान आहे.


सारी हा समूहरोगाचा एक भाग आहे. त्यात अनेक आजारांचा समावेश आहे. कोरोना विषाणू व सारीचा थेट कोणताही संबंध नाही. तरीही कोरोना हा सारीपैकी एक असल्याचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराला आलेल्यांपैकी १३ जणांचा आतापर्यंत सारी तापाने मृत्यू झाला आहे. सारी तापाच्या आजारात जंतूसंसर्ग होऊन फुफ्फुसातील दाब वाढतो.

फुफ्फुसाला सूज येते. न्युमोनिया होऊन रक्तात ऑक्‍सिजन शिल्लक राहत नसल्याने मेंदू, हृदय, किडनी निकामी होतात. शरीरात जंतूसंसर्ग झाल्याने आजाराचे निदान वेळेवर होत नाही. तापाचे जीवाणू, विषाणू रक्तात मिसळतात. रक्त तपासणीनंतरही आजाराचे निदान होत नाही. विषाणू अतिशय सुक्ष्म असल्याने तपासणीत दिसत नाही. माणसाचे हृदय काम करीत नसल्याने फुफ्फुसे बंद पडून हृदय, किडनीवर त्याचा विपरित परिणाम होतो.

आरोग्य विभागाच्या अहवालात..
 कोरोनापाठोपाठ सारी झपाट्याने पसरू लागल्याने अनेकांची पाचावर धारण बसली आहे. या रोगाने मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील अधिक आहे. जिल्हा रुग्णालयाने शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविलेल्या अहवालात सारी तापाने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात सारी तापाचे ११६ रुग्ण सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Active Again : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; मॉन्सून पुन्हा होणार सक्रीय, पुढच्या चार दिवसात पावसाची शक्यता

Belagavi Water Crisis : पाणीटंचाईचं संकट! महाराष्ट्राकडून कर्नाटकला मिळणार का 2 TMC पाणी? मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवकुमार यांच्यात होणार महत्त्वाची चर्चा

Noorjahan Mango: आंब्यांची ‘राणी’ ठरली महागडी! ३.३ किलोच्या नूरजहाँ आंब्याला ३,८०० रुपयांची किंमत, मध्य प्रदेशातील दुर्मीळ आंब्यास परदेशातही मागणी

Latest Marathi News Live Update : सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

US Iran Peace Deal : मध्यपूर्वेत शांततेची नवी पहाट ! अमेरिका-इराणमध्ये ऐतिहासिक शांतता करार; युद्धाला पूर्णविराम, 'होर्मुझ' खुली होणार

SCROLL FOR NEXT