Shiv Sena taluka chief Rupesh Raul commented for sanju parab in sindhudurg 
कोकण

" ऊठसूट पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा शहराच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे " : संजू परब यांना कोणी दिला सल्ला वाचा.....

शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) :  गोरगरीब भाजीवाल्यांवर कारवाई करण्यापेक्षा नगराध्यक्ष संजू परब यांनी कोरोनाच्या काळात शहराच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, तशा सूचना प्रशासनाला द्याव्यात. ऊठसूट पत्रकार परिषद घेऊ नये, असा सल्ला शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी श्री. परब यांना दिला आहे.


आपण योग्य पद्धतीने पालिकेची जबाबदारी सांभाळतो, असे सांगणार्‍या श्री. परब यांच्या पालिकेत कोरोनाग्रस्त व्यक्ती फिरून जाते आणि ते श्री. परब यांच्यासह त्या वार्डातील नगरसेवकाला सुद्धा कळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे, असाही टोला त्यांनी लगावला. याबाबत श्री. राऊळ यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.


पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सावंतवाडीत एखादा व्यक्ती बाहेरगावावरून येतो. पालिकेला त्याची माहिती मिळत नाही. कुठल्याही अधिकारी वर्गाला माहिती नसणेे व वॉर्डातील नगरसेवकानेही माहिती पालिका प्रशासनाला न देणे म्हणजेच नगराध्यक्षांचा पालिका प्रशासनावर अंकुश नाही. त्या कुटुंबियांना क्वारंनटाईन करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची नव्हती का ? हे प्रथमता श्री. परब यांनी जाहीर करावे. नंतरच संबंधित दाम्पत्यावर गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल करून आपली चूक लपवण्याचा हा श्री. परब यांचा प्रयत्न आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जसप्रीत बुमराह पुढची मॅच नाही खेळणार; महत्त्वाचे अपडेट्स, IND vs OMN सामन्यात Playing XI कशी असणार?

माेठी बातमी! 'सोलापुरातील रोज चार व्यक्तींना पोटाच्या कर्करोगाचे निदान'; सकस आहार अन् स्वच्छतेचा अभाव, जंकफूडचे वाढते प्रमाण घातक

Raj Thackeray : नक्की कोण जिंकलं? कोण हरलं? भारत-पाक सामन्यावरून राज ठाकरेंचे फटकारे, नवं व्यंगचित्र केलं शेअर....

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

SCROLL FOR NEXT