ओरोस (सिधुदुर्ग) : कोरोना विषाणुच्या पाश्वभूमीवर केंद्र सरकारने पूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले. आर्थिक व्यवहार कोलमडले होते. या कालावधीत जिल्ह्यातील १३५ बचतगटांनी स्थानिक भाजीपाला, कडधान्य व फळ विक्री करीत तब्बल ३३ लाख २५ हजार ३७१ रुपयांचा व्यवसाय केला आहे. यामुळे या बचतगटांना ८ लाख ३४ हजार ३० रूपये एवढा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक दीपक चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना विषाणुने देशात जोरदार मुसंडी मारल्यानंतर याचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'मानवी संपर्क' तोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने २२ मार्चच्या मध्य रात्रीपासून देशात लॉकडाऊन जाहिर केला. त्यामुळे सर्वच क्षेत्रात बंदी आली होती. मात्र अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला, कडधान्य व आंबा, कळीगण या फळांच्या विक्रिला सुट देण्यात आली होती. परंतु जिल्ह्याच्या सीमा बंद केल्याने बाहेरील जिल्ह्यातून भाजीपाला, कडधान्य अपेक्षित उपलब्ध होत नव्हते. याच कालावधीत जिल्ह्यातील बचतगटांना सक्रीय करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानच्यावतीने घेण्यात आला.
त्यानुसार स्थानिक उत्पादित होणाऱ्या भाज्या, कडधान्य व फळे याची विक्री बचतगटच्या माध्यमातून सुरु करण्यात आली. भाज्यांमध्ये माठ, वाल, हिरवी मिरची, वांगी, शेवग्याच्या शेंगा, कडधान्यमध्ये चवळी, मुग, उडिद, कुळीथ तर फळांमध्ये आंबा व कळीगण याचा समावेश करण्यात आला होता. जिल्ह्यातील १३५ बचतगट यात सहभागी झाले होते. लॉकडाऊन काळात सर्वच व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक व्यवहार थांबले होते. मात्र, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या बचतगटांना अभियानाच्या यंत्रणेने सहकार्य केल्याने १३५ बचतगटातील महिलांना आर्थिक वृद्धि साधता आली आहे. तब्वल ३३ लाख २५ हजार ३७१ एवढ्या रक्कमेची आर्थिक उलाढाल केली. यात ८ लाख ३४ हजार ३० रूपये एवढा निव्वळ नफा मिळविला आहे.
९ हजार ३०७ क्विंटल भाजीची विक्री
लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील नागरिकांना ताजी भाजी मिळत नव्हती. घाटमाथ्यावर उत्पादित होणारी भाजी उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातच उत्पादित होणारी माठ, वाल, हिरवी मिरची, वांगी, शेवग्याच्या शेंगा या भाज्यांची विक्री बचतगटातील महिलांनी केली. तब्बल ९ हजार ३०७ क्विंटल भाज्यांची एकूण विक्री करण्यात आली. यामुळे एकूण ६ लाख ९८ हजार ९१ रुपयांची ही विक्री झाली. यातून बचतगटांना एकूण २ लाख ५३ हजार ७५ रूपये एवढा निव्वळ नफा झाला आहे.
तब्बल १६ लाख रुपयांची फळ विक्री
लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यातील बचतगटांनी स्थानिक उत्पादित फळ विक्रीवर भर दिला होता. यात आंबा व कळीगण यांचा समावेश होता. तब्बल १६ लाख ५ हजार १८० रुपयांची फळ विक्री केली. यामुळे सहभागी बचतगटांना मोठा आर्थिक फायदा झाला. ३ लाख ६५ हजार १८० रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बचतगटांच्या या फळ विक्रिला जिल्ह्यातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
चवळी, कुळीथला मोठी मागणी
लॉकडाऊन काळात बाजारपेठा बंद असल्याने जीवनावश्यक असलेले कडधान्य पुरेसे मिळत नव्हते. त्यामुळे उमेद अभियान यंत्रणेने बचतगटांनी जिल्ह्यात पिकणारे कडधान्य विकण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार चवळी, मुग, उडीद व कुळीथ हे कडधान्य विकण्यात आले. १२० क्विंटल ५ किलो एवढे हे कडधान्य विक्री झाले. तब्वल १० लाख २२ हजार रूपये किमतीचे हे धान्य विकले गेले. यातून बचतगटांना २ लाख १५ हजार १७५ रूपये एवढा निव्वळ नफा झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.