कोकण

कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला

CD

88541
वैभव नाईक

कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला

वैभव नाईक ः आमदार नितेश राणेंनी शिवसेनेचा विचार करू नये

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १२ ः जिल्हातील ठाकरे शिवसेनेचे तिन्ही जिल्हाप्रमुख भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करणाऱ्या भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या कुंटुंबीयांचे राजकीय अस्तित्व आता संपत चालले आहे. भाजपमध्ये गेल्यापासून त्यांचे कार्यकर्ते आता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मागून फिरत आहेत. त्यामुळे राणेंनी शिवसेनेचा विचार करू नये, असा सल्ला आमदार वैभव नाईक यांनी आज येथे दिला.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यापुढेही तो कायम राहणार आहे. खेड येथील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला जनतेच्या लाभलेल्या प्रतिसादामुळे हे दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेनेला संपविण्याची स्वप्ने कोणी पाहू नयेत, असा टोलाही आमदार नाईक यांनी लगावला.
आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टिकेला आमदार नाईक यांनी येथील विजय भवनात आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘दोन हजार कोटींचा निधी राज्याने कणकवली विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी दिल्याचेही आमदार राणे यांनी जाहीर केले. यापूर्वी कणकवलीत ८०० कोटींचा एजीडॉटर्स कंपनीचा प्रोजेक्ट, विनोद कांबळी क्रिकेट अकादमी, अॅडव्हेंचर वॉटर स्पोर्ट्स असे प्रकल्पही त्यांनी आणले. त्याचे काय झाले, हे येथील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे राणेंच्या घोषणा कागदावरच्या आहेत. पण, राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या घोषणा सत्यात उतरल्या आहेत. जिल्ह्यासाठी ७५० कोटींचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. आमदार राणे असूदेत किंवा जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष असूदेत त्यांनी बँक निवडणुकीवेळी खावटी कर्ज माफ होईल, अशी घोषणा केली होती. मात्र, अलीकडेच सादर झालेल्या अर्थसंकल्पात त्याबाबतची तरतूदच करण्यात आलेली नाही. केसरकर यांच्याबाबत नीलेश राणे एक मत मांडतात तर नितेश राणे दुसरे. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही राणे पुत्रांनी आपल्या वडिलांबरोबर एकत्र बसून केसरकर यांच्याबाबतची भूमिका ठरवावी. त्यानंतर ती जनतेसमोर जाहीर करावी. सत्तेसाठी आम्ही कधीही पक्ष बदल केलेला नाही. त्यामुळे शेवटचा आमदार जरी शिल्लक राहिला तरी मी उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणार आहे.’’
--------
चौकट
तिन्ही जिल्हाप्रमुख सक्षम
आमदार नाईक म्हणाले, ‘‘मी पंधरा वर्षे जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे त्या पदाची कोणाला तरी जबाबदारी द्यावी, अशी मागणी गेली दोन वर्षे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे करीत होतो. आता दिलेले तिन्ही जिल्हाप्रमुख सक्षम आहेत. पक्षप्रमुख वेळोवेळी जी जबाबदारी माझ्यावर देतील, ती समर्थपणे पार पाडली जाईल. आता जरी पक्षाचे नाव व चिन्ह गेले असले तरी आगामी निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ. त्यानंतर ते चिन्ह व नाव परत मिळवू.’’
-----------
चौकट
केसरकरांकडून शिवसैनिकांचा अपमान
श्री. नाईक म्हणाले, ‘‘आपण पैसे दिल्याने पद दिले, पैसे दिल्यानेच शिवसेना वाढली, असे दीपक केसरकर सांगत आहेत; मात्र, अनेक शिवसैनिकांनी पक्ष वाढीसाठी रक्त सांडले आहे. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. त्या शिवसैनिकांनी केलेल्या त्यागामुळे पक्ष वाढला आहे. मात्र, केसरकर यांनी त्या सर्व शिवसैनिकांचा अपमान केला आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT