कोकण

ःजिल्ह्यात शासन लाभार्थ्याच्या उंबरठ्यापर्यंत

CD

२५ ( पान १ साठी)


जिल्ह्यात शासन लाभार्थ्याच्या उंबरठ्यापर्यंत

पालकमंत्री सामंत ; ९० हजार लोकांना देणार लाभ

चिपळूण, ता. २३ ः जनतेला शासकीय कार्यालयात सारखे हेलपाटे मारायला लागू नयेत. शेतीची कामे सोडून दाखले व अन्य योजनांचा फायदा घेण्यास तालुक्याला यायला लागू नये. हे लक्षात घेऊन राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच शासन उंबरठ्यापर्यंत जाणार आहे. त्या माध्यमातून गावातच शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल. असे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात सामंत यांच्या उपस्थितीत २५ रोजी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले, जिल्ह्यातील ९० हजार लोकांना शासन आपल्या दारी योजनेतून लाभ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील २५ हजार लोक उपस्थित राहतील. त्याचे सर्व नियोजन झाले आहे. फक्त चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील लोकांना तब्बल १४ कोटीच्या शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. त्या पद्धतीने अन्य तालुक्यातील देखील कोट्यवधी निधीचा लाभ मिळत आहे. या पुढच्या टप्प्यात अधिक जोमाने ही योजना राबविण्यात येईल. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघासाठी वाहने घेऊन प्रत्येक ठिकाणी नायब तहसीलदारांची नेमणूक करण्यात येईल. शासकीय योजनांचा लाभ गावातच मिळेल, याची व्यवस्था केली जाईल. राज्यात प्रथमच असा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात राबवला जाणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील ५५ जिल्हा परिषद गटात आरोग्य शिबिरे घेण्यात येतील.
पुढच्या काळात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी शोधून त्यांच्या गावातच लाभ देण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यांनी सामाजिक जाणीव ठेवून जनताभिमुख काम करावे. कंत्राटदारनिष्ठ काम करू नये, असा चिमटा सामंत यांनी काढला.
---------
अधिकाऱ्यांना धारेवर धरले
बैठकीत माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जलजीवनच्या मार्गताम्हाणे येथील योजनेच्या फलकावर काम सुरू केल्याच्या तारखेच्या ठिकाणी काम पूर्ण केल्याची तारीख टाकण्यात आली, तर काम पूर्ण झाल्याच्या तारखेच्या ठिकाणी काम सुरू होण्याची तारीख टाकल्याचा निदर्शनास आणले. त्यावर पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयुष चावलाने हैदराबादला दिला मोठा दणका! धोकादायक ट्रेविस हेडला धाडलं माघारी

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT