कोकण

राजापूर आगारातील 12 फेऱ्या रद्द

CD

राजापूर आगारातील १२ फेऱ्या रद्द
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ः रत्नागिरी येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ या योजनेसाठी राजापूर एसटी आगारातून गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे एसटी आगार प्रशासनाने १२ फेऱ्या रद्द केल्या होत्या. फेऱ्या रद्दचे नियोजन करताना ज्या भागातील फेऱ्या रद्द केल्या तो भाग वा मार्गावर दिवसभरामध्ये एसटी गाडीची एकतरी फेरी होईल, याचे नियोजन एसटी विभाग प्रशासनाने केले होते. त्यामुळे फेऱ्या रद्द झाल्या असल्या तरी त्याचा प्रवाशी वाहतुकीला फारसा फटका बसला नाही.
राजापूर एसटी आगारातून दिवसभरामध्ये राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये धावणाऱ्या लोकल फेऱ्यांसह तालुक्याबाहेरच्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या मिळून सुमारे अडीचशे फेऱ्या सुरू असतात. त्यापैकी १२ फेऱ्या रद्द केल्या होत्या. या फेऱ्यांमधून सर्वसाधारणपणे ५०० प्रवाशांनी प्रवास केला असता आगाराला सुमारे ६५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
तालुक्यातून सुमारे ३ हजार लाभार्थ्यांसाठी एसटी आगारातून ६५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये येथील एसटी आगारातील नियमित २० गाड्यांचा समावेश होता. त्यामुळे रद्द करण्यात आलेल्या फेऱ्यांची पूर्वकल्पना प्रवाशांना देण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT