Mirya Beach esakal
कोकण

Mirya Beach : मिऱ्या बंधाऱ्याबाबत ठेकेदाराला 'पत्तन'ची नोटीस; मुदत संपली तरी 50 टक्केच काम पूर्ण!

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची (Mirya Beach) मुदत संपुष्टात आली तरी ५० टक्केच काम झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मिऱ्या बंधाऱ्याचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीला इन्फ्रा प्रोजेक्टस्ला नोटीस बजावली आहे. बंधाऱ्याची मुदत संपली असून वाढीव ६ महिन्यांची मुदत ठेकेदाराने मागितली आहे.

रत्नागिरी : मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची (Mirya Beach) मुदत संपुष्टात आली तरी ५० टक्केच काम झाले आहे. आणखी ६ महिने मुदतवाढ मिळावी यासाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठवला आहे; परंतु डी. व्ही. पी. इन्फ्रा प्रोजेक्टस् प्रा. लि. या ठेकेदार कंपनीकडून अतिशय धिम्या गतीने बंधाऱ्याचे काम सुरू आहे. वारंवार नोटीस देऊनही त्यामध्ये काही बदल होत नाही, हे खेदजनक आहे.

त्यामुळे पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याचे काम पूर्ण करा; अन्यथा पावसाळ्यात येणाऱ्या चक्रीवादळामुळे (Cyclone) होणाऱ्या जीवित व वित्तहानीस सर्वस्वी आपण जबाबदार असाल, अशी खरमरीत नोटीस पत्तन विभागाने इन्फ्रा प्रोजेक्टस् (Infra Projects) ठेकेदार कंपनीला दिली आहे.

एवढेच नाही तर कंपनीच्या या ढिसाळ कारभाराबाबत पुन्हा एकदा १८ लाख ८० हजारांचा दंड प्रस्तावित केला आहे. शहराला लागून असलेल्या मुरूगवाड्यापासून पांढरा समुद्र ते मिऱ्या (मोरे टेंब) पर्यंतचा साडेतीन किमी लांबीचा व ३ मीटर रूंदीचा धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. येथे ५ मीटर उंचीची व १३०० मीटरपर्यंत टेट्रापॉड टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्णत्वास आल्यानंतर रोजगारनिर्मिती व पर्यटन विकासासाठी येथे सुशोभीकरण केले जाणार आहे.

मिऱ्या किनाऱ्याची पावसाळ्यात उधाणात प्रचंड धूप होते. समुद्राचे अतिक्रमण स्थानिकांच्या सातबाऱ्यावर आले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये नारळाच्या बागा, घरांच्या संरक्षण भिंतीही समुद्राने गिळंकृत केल्या ओहत. तरीही आज बंधारा बांधण्याचे काम धिम्या गतीनेच सुरू आहे. धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या १६९ कोटींच्या कामाचे २६ डिसेंबर २०२१ मध्ये राज्याचे तत्कालीन उप‌मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले; पण त्या बंधाऱ्याचे केवळ ५० टक्केच काम पूर्ण झाले आहे. २ वर्षांत हे काम पूर्ण करण्याची मुदत शासनाने दिली आहे; परंतु, २ वर्षे पूर्ण झाली तरी फक्त ५० टक्केच धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम झाले आहे.

ठेकेदार कंपनीकडून अटीशर्थीला बगल दिली जात असल्याने आणि कामाच्या गतीमध्ये ढिसाळपणा होत असल्याने पत्तन विभागाने ठेकेदाराला १ फेब्रुवारीला नोटीस बजावली आहे. गेल्या पावसाळ्यात देखभाल दुरुस्ती व निधीच्या अडचणीमुळे ४ महिने हे काम बंद राहिले होते. ते काम सुरू करण्याचे पत्र पत्तन विभागामार्फत देण्यात आले होते. त्यामुळे बंद पडलेले धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू झाले असले तरी त्याला अपेक्षित गती नाही म्हणून पुन्हा नोटीस बजावली आहे.

दृष्टिक्षेपात...

  • माईलस्टोन पूर्ण न झाल्याने दंड

  • १८ लाख ८० हजार दंडाचा प्रस्ताव

  • आतापर्यंत ८० कोटी रक्कम अदा (जीएसटीसह)

  • ठेकेदाराला आतापर्यंत चार दंड

मिऱ्या बंधाऱ्याचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीला इन्फ्रा प्रोजेक्टस्ला नोटीस बजावली आहे. बंधाऱ्याची मुदत संपली असून वाढीव ६ महिन्यांची मुदत ठेकेदाराने मागितली आहे. तसेच अटीशर्थीचा भंग केल्यामुळे १८ लाख ८० हजारांचा दंड प्रस्तावित केला आहे.

-राहुल सिसोदे, अभियंता, पत्तन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस की भाजप? अरविंद केजरीवाल यांच्या तुरुंगातून बाहेर येण्याचा राजकीय फायदा कुणाला?

Pimpri Chinchwad Crime : काळेवाडीतील लकी बेकरी चौकात पैशांच्या कारणावरून तरुणाचा खून

T20 WC: भारत जिंकतोय खरा, पण...! अनिल कुंबळे, फॅफ ड्यू प्लेसिस यांनी व्यक्त केली चिंता; वेस्ट इंडिजविरुद्ध ही उणीव पडणार महागात

Aurangzeb Daughters : औरंगजेबाने कधीच स्वतःच्या मुलींचे लग्न का केले नाही? कारण वाचून अंगावर येईल काटा, हा क्रूर इतिहास ठेवलेला दडवून

SEBI on Gold : सोन्याच्या दराबाबत सेबीचा मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून लागू होणार नवीन नियम

SCROLL FOR NEXT