अकरावीची प्रवेश प्रक्रिया
ऑफलाईन करणे गरजेचे
नाईक, सावंत ः शिक्षणमंत्र्यांना निवेदन
कणकवली, ता.२८ ः अकरावी प्रवेशासठीची ऑनलाईन प्रक्रिया करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया ऑफलाईन करावी. दहा टक्के इन हॉऊस कोटा आणि नॉनक्रिमिलेअर ही अटदेखील रद्द करावी, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दिले आहे.
निवेदात म्हटले आहे की, ‘यंदा अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया करताना तांत्रिक अडचणी आल्यामुळे अजूनही ३ लाख १५ हजार विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया झालेली नाही. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाला केवळ १० टक्के इन हाऊस कोट्याची अटदेखील जाचक आहे. याखेरीज मागासवर्ग, इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती, जमाती, आर्थिक मागास या विद्यार्थ्यांनाही नॉनक्रिमिलेअर अनिवार्य असून ही अटदेखील रद्द व्हावी. अन्यथा अनेक विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. याबाबतचे निवेदन शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर यांनाही दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.