rat29p3.jpg-
73941
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर.
शाहू महाराजांनी पुरोगामी धोरणे
राबवलीः डॉ. मकरंद साखळकर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. ते एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली, असे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य (स्वायत्त) डॉ. मकरंद साखळकर यांनी केले. राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे गुणविशेष विषद केले.
ते म्हणाले की, १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत महाराजांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते. तसेच त्यांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. प्रास्ताविक डॉ. रामा सरतापे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.