कोकण

रत्नागिरी - खड्डेमय रस्त्यातून प्रवासाचा हा शेवटचा गणेशोत्सव

CD

रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग...लोगो

महामार्गाचे ३६४ पैकी २१ किलोमीटरची कामे शिल्लक
उदय सामंत ; खड्डेमय रस्त्यातून प्रवासाचा हा शेवटचा गणेशोत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ०५ : मुंबई-गोवा महामार्गाचा ३६४ पैकी २१ किलोमीटरचा रस्ता शिल्लक आहे. त्यात साडेचार किमीचा डबल लेन रस्ता शिल्लक आहे. खड्डेमय रस्त्यातून प्रवासाचा हा शेवटचा गणेशोत्सव आहे. पुढील वर्षी महामार्ग पूर्ण झालेला असेल. ओव्हरब्रिज व पुलांची कामे मार्च-एप्रिलपर्यंत पूर्ण होतील, असे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरीत पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, आपण आठ दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. त्या वेळी अधिकारी आणि ठेकेदारांना काही सूचना केल्या होत्या. शनिवारी चिपळूण येथून रत्नागिरीत येताना केलेल्या सूचनांवर कोणती अंमलबजावणी झाली, याची आपण पाहणी केली. सूचनांप्रमाणे कामाला सुरवात झाली आहे. संगमेश्वर येथे कसबा शास्त्रीपुलाजवळ डोंगराचा भाग धोकादायक झाला होता. त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी डिव्हायडरच्यामध्ये माती टाकण्यासाठी रस्त्यावरच माती आणून टाकण्यात आली होती. त्याबाबतही ठेकेदाराला सूचना करण्यात आली आहे.
महामार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. २१ किमीचा मार्ग शिल्लक आहे. त्यातील फक्त साडेचार किमी डबल लेनचे काम राहिले आहे; पण ते पुढील गणपतीच्या आधी पूर्ण होईल. चिपळूण येथील ओव्हरब्रिज एप्रिलपर्यंत, कसबा व संगमेश्वर येथील पुलांची कामे एप्रिल तर बावनदी आणि निवळी ओव्हरब्रिजचे काम मार्चपर्यंत, पाली येथील ओव्हरब्रिज मार्चपर्यंत, लांजा येथील ओव्हरब्रिज एप्रिलपर्यंत पूर्ण होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT