कोकण

प्लास्टिक फुलांवरील बंदीचा फूल शेतकऱ्यांना दिलासा

CD

प्लास्टिक फुलांवरील बंदीचा फूल शेतकऱ्यांना दिलासा
ताज्या फुलांची मागणी वाढेल; प्रभावी अंमलबजावणीची गरज
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २८ ः राज्यात कृत्रिम व प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या गणेशोत्सवात बाप्पांची पूजा नैसर्गिक, सुगंधित फुलांनी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारतीय संस्कृतीत फुलांचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. पूजा, उत्सव, विवाह किंवा कोणताही शुभ प्रसंग फुलांशिवाय अपूर्णच मानला जातो. मात्र मागील काही वर्षांत प्लास्टिकच्या फुलांनी बाजारपेठ काबीज केल्याने नैसर्गिक फुलांची मागणी मोठ्याप्रमाणात घटली होती. प्लास्टिक माळा स्वस्त आणि टिकाऊ असल्यामुळे ग्राहक त्या अधिक प्रमाणात खरेदी करत होते. परिणामी जिल्ह्यात झेंडू, गुलाब, लिली यासारखी फुले पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत होते. शासनाने कृत्रिम व प्लास्टिक फुलांवर घातलेल्या बंदीमुळे नैसर्गिक फुलांना पुन्हा मागणी वाढणार आहे. दरही काही प्रमाणात स्थिर राहण्याची शक्यता आहे. कारण गणेशोत्सवात फुलांची विक्री सर्वाधिक होते. मात्र, उत्पादन व पुरवठा नियमित ठेवणे आवश्यक आहे. घोषणा झाली असली तरीही अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. बाजारात अद्यापही काही विक्रेते प्लास्टिक माळा विक्री करत आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली, तरच या निर्णयाचा खरा फायदा शेतकऱ्यांना होईल.

चौकट
फुलांसाठी परजिल्ह्यावर अवलंबून
रत्नागिरी जिल्ह्यात काही प्रमाणात फुलांची शेती होते. मात्र बहुतांश फुले पुणे, कोल्हापूर, नवी मुंबई येथून येतात. स्थानिक पातळीवर फुलांची उत्पादकता वाढवण्यासाठी सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम फुलांवर बंदी ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, या निर्णयाची योग्य अंमलबजावणी आणि नैसर्गिक फुलांची मुबलक उपलब्धता हे दोन घटक यशाचे मुख्य आधार ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारताने विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्यास का दिला नकार? कर्णधार सूर्यकुमारने स्पष्ट शब्दात सांगितलं

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT