कोकण

आरजू फसवणुकीतील ग्राहकांचे १५ ला उपोषण

CD

आरजू फसवणुकीतील
ग्राहकांचे १५ ला उपोषण
रत्नागिरी, ता. १२ ः रत्नागिरीतील तथाकथित आरजू कंपनी घोटाळ्यात फसवणूक झालेल्या ग्राहकांनी न्याय मिळवण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. ही माहिती दीपराज शिंदे यांनी दिली.
गेले वर्षभर विविध प्रकारच्या मागण्यांसाठी फसवणूक झालेले ग्राहक प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत होते. ही केस वर्षभर चालू असून, त्यातील ३ आरोपींना पकडण्यात पोलिस प्रशासनाला यश आले; मात्र मुख्य आरोपीला अद्यापही पकडण्यात आले नाही. त्याला पकडावे आणि जे ग्राहक फसलेले आहेत त्यांना नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी विलास वामन सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीकडून फसवणूक झालेल्या जवळजवळ ५८७ ग्राहकांनी उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. १५ ऑगस्टच्या उपोषणावर ते सर्व ठाम आहेत. हे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयापुढे करत असल्याचे विलास सुर्वे आणि दीपराज शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2025 Live Streaming: भारतात सुरू होतोय १२ वर्षांनंतर वर्ल्ड कपचा थरार! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या एका क्लिकवर

Nilesh Ghaiwal : निलेश घायवळ स्विर्झलंडमध्ये; ९० दिवसांचा मिळवला व्हिसा

lioness guard VIDEO : नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरासमोर चक्क सिंहिणीचा पहारा!

IND vs WI: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विंडीजला आणखी दुसरा मोठा धक्का; टीममध्ये केला बदल

२ तारखेला सोलापूर शहरातील वाहतूक मार्गात बदल! विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनी पारंपारिक वाद्याच्या गजरात निघणार मिरवणुका; ‘डीजे’ला बंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT