महामार्गावरील अडचणी दूर करा
अजित पवार यांचे आदेश ; मुंबईत आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः मुंबई-गोवा महामार्गावरून दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक झाली. या बैठकीला मंत्रालयीन व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी तसेच मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाची डागडुजी व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची गरज असल्याचे खासदार तटकरे यांनी मांडले. जनआक्रोश समितीने १० ऑगस्ट रोजी पळस्पेफाटा, पनवेल येथे पाटपूजा करून आंदोलन सुरू केल्याची बाबही या वेळी निदर्शनास आणून दिली. अपूर्ण बोगद्यांमुळे वाहतुकीला अडथळा येत असेल तर तेथील कामे पूर्ण करा. त्यासाठी निधी मंजूर आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून ही कामे पूर्ण होईपर्यंत देखरेख करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महामार्गावरील खड्ड्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्याची व तक्रार मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत कार्यवाही करण्याचीही सूचना पवार यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.