कोकण

जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री बंद

CD

रत्नागिरीत १ ला ‘लोकशाही दिन’
रत्नागिरी ः जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’ साजरा होतो. सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ ते २ या वेळेत होणार आहे. लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात, असे प्रभारी उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळवले आहे.

राष्ट्रीय क्रीडादिननिमित्त विविध स्पर्धा
रत्नागिरी ः मेजर ध्यानचंद (हॉकीचे खेळाडू) यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्त जिल्ह्यात २९ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. विविध उपक्रमांमध्ये मनोरंजनात्मक खेळ, स्पर्धा, मॅरेथॉन व दौड आयोजित करावयाच्या आहेत तसेच एकविध क्रीडा संघटनांच्या सहकार्याने प्रदर्शनीय सामने, क्रीडाविषयक चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करावे. २९ रोजी मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहणे, फिट इंडिया प्रतिज्ञा आणि ६० मिनिटे सांघिक क्रीडा आणि मनोरंजनात्मक खेळ. ३० रोजी तंदुरुस्तीवर चर्चा, स्वदेशी खेळांभोवती क्रीडा स्पर्धा, घरातील खेळ, तर ३१ रोजी रविवारी फिट इंडिया सायकल रॅलीचे आयोजन करावे. वयोमानानुसार रस्सीखेच, योगा, ५० मीटर रिले धावणे, मॅरेथॉन, चमचा शर्यत, क्रिकेट, सायकलिंग, कबड्डी, तर ज्येष्ठ नागरिक गटाने ३०० मीटर वेगाने चालणे, १ कि. मी. चालणे स्पर्धा घ्यावेत.

जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री बंद
रत्नागिरी ः जिल्ह्यात २७ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी, २ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन, ६ ला अनंत चतुर्दशी या तिन्ही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी-विदेशी मद्यविक्री व ताडी-माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. यावर्षी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने हे आदेश जिल्हाधिकारी सिंह यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून, यामध्ये कसूर केल्यास संबंधित कारवाई करण्यात येईल, असेही नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT