पालकमंत्री सामंत यांना
‘रत्नभूषण पुरस्कार’ जाहीर
रत्नागिरी, ता. २१ : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘आभार’ संस्थेचा आठवा ‘रत्नभूषण पुरस्कार २०२५’ पालकमंत्री उदय सामंत यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. ‘गुरुगौरव व रत्नभूषण पुरस्कार सोहळा’ शनिवारी (ता. २३) सायंकाळी साडेतीन वाजता स्वयंवर मंगल कार्यालयात होणार आहे, अशी माहिती आभार संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप पाखरे यांनी दिली. पुरस्कार सोहळ्यात जिल्ह्यातील वयोवृद्ध भजन कलाकारांना ''गुरूगौरव सन्मान'' देऊन गौरवण्यात येणार आहे. यामध्ये मिलिंद आरेकर-बुवा कोतवडे, विनायक डोंगरे-आंबेशेत, गिरीशशेठ विचारे-राजापूर आणि विश्वास करगुटकर-आंबोळगड राजापूर यांना गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.