-rat१०p६.jpg-
२५N९०५५८
संगमेश्वर ः संगमेश्वर-देवरूख मार्गावर प्रवास करणे धोकादायक झाले आहे.
---
संगमेश्वर-देवरूख प्रवास नको रे बाबा....
खड्डे भरूनही दुर्दशा कायम; साईडपट्ट्या बनल्या धोकादायक
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १० ः गणेशोत्सवादरम्यान संगमेश्वर ते देवरूख या मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम केले असले तरी प्रवाशांचे हाल काही थांबलेले नाहीत. बुरंबी ते लोवलेदरम्यान रस्त्यावरील मोठमोठे खड्डे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या मार्गावर प्रवास करणे प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहे. या मार्गाची एका बाजूची साईडपट्टी धोकादायक बनली असून, खासगी कंपनीने केबल टाकल्यानंतर साईडपट्टीची दुरुस्ती न केल्याने अनेक वाहने साईडपट्टीवर फसत आहेत. या सर्व बाबींकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या रस्त्यावरील खड्डे दगडी चिऱ्यांनी भरले जात आहेत; मात्र हे फक्त तात्पुरते उपाय असल्याचे स्थानिक सांगतात. पाऊस पडल्यानंतर हे खड्डे पहिल्यापेक्षा अधिक धोकादायक होतात आणि वाहनचालकांचे तसेच प्रवाशांचा जीव टांगणीला लागतो. या मार्गावरून सद्यःस्थितीत दुचाकी वाहने अत्यंत धोकादायक बनले असून, अनेक दुचाकीस्वार खड्ड्यातून वर आलेल्या खडीवरून घसरून अपघात होत आहेत. साडवलीदरम्यानही रस्त्याला दोन ठिकाणी मोठे खड्डे आहेत.
एप्रिल आणि मे या दोन महिन्यात खासगी कंपनीने ऑप्टिकल फायबर केबल टाकताना या मार्गाच्या साईडपट्टीची पूर्ण दुर्दशा केली. साईडपट्टीचे गाईडस्टोन विखरून टाकले. साईडपट्टीवर मोठे दगड आजही अपघातास निमंत्रण देत आहेत. याबाबत मे महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांची संपर्क साधला असता त्यांनी साईडपट्टीवर केबल टाकणाऱ्या ठेकेदाराकडून रोलर फिरवून घेणार असल्याचे सांगितले; मात्र प्रत्यक्षात या मार्गावरील साईडपट्टीवर कुठेही रोलर फिरवला गेला नाही. परिणामी, पावसाळ्यात ठिकठिकाणी साईडपट्टीवर गेलेली वाहने रुतल्याचे पाहायला मिळाले.
चौकट
खर्च ठेकेदार देणार का?
सार्वजनिक बांधकाम विभाग देवरूखच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अवजड वाहनचालकांना याचा मनस्ताप अजूनही सहन करावा लागत आहे. साईडपट्टीवर अडकलेली वाहने काढण्यासाठी होणारा खर्च सार्वजनिक बांधकाम विभाग खासगी कंपनीची केबल टाकणाऱ्या ठेकेदाराकडून वसूल करून देणार का? असा सवाल वाहनचालक सुनील दळवी यांनी उपस्थित केला आहे. खासगी कंपनीने साईडपट्टीवरून केबल टाकताना सार्वजनिक बांधकाम विभागाने जे दुर्लक्ष केले त्याची चौकशी करण्याची मागणी संजय कदम यांनी केली आहे.
चौकट
वाहनचालकांसाठी शिक्षा
मुंबई-गोवा आणि मिऱ्या-नागपूर या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा संगमेश्वर-साखरपा हा ३२ किमीचा मार्ग राजापूरकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून देखील वापरला जातो. सद्यःस्थितीत संगमेश्वर बसस्थानकापासून कोसुंबपर्यंत ठिकठिकाणी रस्ताच शिल्लक नाही, अशी स्थिती आहे. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांसह प्रवाशांसाठी दररोजची शिक्षा ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.