93323
अवैध वाळू उपसा
तातडीने थांबवा!
वेंगुर्ले, ता. २२ ः तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावरील होणाऱ्या अवैध वाळू उपसाबाबत आरवली टांक येथे अज्ञातांकडून फलक लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. ‘आमचा समुद्रकिनारा वाचवा, अवैध वाळू उपसा थांबवा’, अशी मागणी या फलकाद्वारे करण्यात आली आहे.
तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावरील वाळूची बैलगाड्यांनी तस्करी केली जात असल्याचे या फलकावरून अधोरेखित करण्यात आले आहे. तर प्रजननासाठी समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासव वाचवाची मागणीही यात आहे. एका बाजूला हातात पैशांची बॅग घेतला सूटमधील व्यावसायिक पारंपरिक मच्छिमार व स्थानिक मच्छिमार यांना ‘समुद्र तुमच्या बापाचा नाही’ असे सांगत असल्याचे चित्र दाखवण्यात आले आहे. दरम्यान, या फलकामुळे वेंगुर्लेतील काही समुद्र किनाऱ्यावर अवैध वाळू उपसा होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. याबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.