वादळाच्या इशाऱ्याने मच्छीमार हवालदिल
जिल्ह्यात जोरदार पाऊस ; नवरात्रोत्सवाच्या उत्साहावर विरजण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, समुद्रात वादळ असल्याने मच्छीमारांनी २९ सप्टेंबरपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन मत्स व्यवसाय विकास अधिकारी जे. डी. सावंत यांनी केले आहे. वादळाच्या धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे मासेमारीचे आणखी काही दिवस वाया जाणार आहेत. बाजारपेठा, नवरात्रोत्सवातील दांडियावर या पावसाचा मोठा परिणाम झाला.
पावसाळी मासेमारी बंदीनंतर १ ऑगस्टपासून पारंपरिक तर १ सप्टेंबरपासून मासेमारी सुरू झाली. मासेमारी सुरू होऊनही पूर्णक्षमतेने मासेमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत. मासेमारीसाठी आवश्यक असणारी खलाशी, जाळी व इतर सुविधांची पूर्वतयारी करण्यात वेळ जातो. त्यानंतर हवामान विभागाच्या धोक्याच्या इशाऱ्यामुळेही नौका समुद्रात जाऊ शकत नाहीत. पारंपरिक आणि पर्ससीन नेट नौकांची मासेमारी अनेक दिवस होऊ शकली नाही. हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह समुद्रातील वादळाचा इशारा दिला आहे. समुद्रात तीन नंबरचा बावटा लावण्यात आला असून, मच्छीमारांनी २९ सप्टेंबरपर्यंत समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. काल रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज सायंकाळपर्यंत सुरू होता. पावसात जोर नसला तरी रिपरिप सुरू होती. त्यामुळे नवरात्रोत्सवावर विरजण पडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.