rat5p10.jpg-
96598
साखरपा : रस्त्याकडेला बसवण्यात आलेला ३३ केव्ही लाइनचा नवीन खांब.
साखरपा-देवरुख मार्गावरील विद्युत खांब धोकादायक
जयसिंग माने ; अपघाताची शक्यता, खांब हटवण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ५ : साखरपा-देवरुख मार्गावर महावितरण कंपनीने ३३ केव्ही वाहिनीसाठी नव्याने उभारलेले विद्युत खांब रस्त्याच्याकडेला आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे विद्युत खांब तातडीने हटवा, अशी मागणी माजी सभापती जयसिंग माने यांनी महावितरणकडे केली आहे.
देवरुख-साखरपा महामार्गावर महावितरण कंपनीमार्फत सध्या नवीन विद्युत खांब टाकण्यात येत आहेत. त्या खांबांवरून ३३ केव्हीची वाहिनी टाकण्यात येणार आहे. नव्याने बसवण्यात येत असलेले खांब हे रस्त्याच्या कडेला बसवण्यात येत आहेत. काही ठिकाणी तर रस्त्याच्या बाजुपट्टीवरच खांब बसवलेले आहेत. देवरुख ते साखरपा दरम्यान मुरादपूर ते बावनदी पूल दरम्यान एक छोटा घाट आहे. तसेच बावनदी पूल ते साखरपा दरम्यान सुमारे ८ किलोमीटरचा दुसरा घाट आहे. हा संपूर्ण रस्ता घाटाचा असल्यामुळे ठिकठिकाणी तीव्र वळणे आहेत. अशा वळणांवर वेग नियंत्रित न झाल्यास वाहने सरळ खांबावर जावून धडकण्याची भीती आहे. अशावेळी वरुन ३३ केव्ही एवढ्या उच्च दाबाची विद्युत तार वाहनांवर पडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. या सर्व प्रकाराबाबत पंचायत समितीचे माजी सभापती जयसिंग माने यांनी आवाज उठवला आहे. हे खांब तातडीने काढून महामार्गापासून काही अंतरावर उभे करावेत, असे त्यांनी सांगितले. याबाबत आमदार किरण सामंत यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.