आकाश नीरभ्र झाल्याने
शेतकरी राजा सुखावला
दिवाळीपूर्वी भात कापणीची लगबग
कणकवली, ता. १२ ः तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. मात्र, दोन दिवसांपासून सूर्यदर्शन होऊ लागले आहे. आकाशही नीरभ्र आहे. त्यामुळे शेतकरी भात कापणीच्या कामाला सुरुवात करीत आहेत.
बहुतांश ठिकाणी भात पीक तयार झाले आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी सखल भागांमध्ये अद्यापही पाणी आहे. त्यामुळे भरडी शेती कापण्यासाठी शेतकऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे. या वर्षी १५ मेच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. त्यामुळे भातशेतीची कामेही मे महिन्यात सुरू झाली. पेरणीनंतर बहुतांश पिकाला १२० ते १३० दिवसांचा कालावधी उलटला आहे. शेतकऱ्यांकडे संकरित आणि सुधारित बियाणे असल्याने १२० दिवसांपासून भात पीक तयार होत आहे. सखल भागात पाणी असले तरी पीक तयार झाले आहे. त्यामुळे पावसाने अशाच पद्धतीने विश्रांती घेतली तर शेतकऱ्यांना भात कापणीची कामे लवकर उरकता येणार आहेत. दिवाळीला काही दिवस शिल्लक असल्याने शेतकरी भात कापणी करून सणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.