‘ते’ विद्युत खांब बदला
साखरपा, ता. ५ ः साखरपा-देवरूख मार्गावर महावितरणने ३३ केव्ही वाहिनीसाठी नव्याने खांब टाकले आहेत. हे खांब अगदी रस्त्याकडेला बसवण्यात आले असल्याने अपघाताची शक्यता आहे. हे खांब तातडीने हटवावेत, अशी मागणी माजी सभापती जयसिंग माने यांनी केली आहे.
काही ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्टीवरच हे खांब बसवण्यात आले आहेत. मुरादपूर ते बावनदी पूलदरम्यान एक छोटा घाटउतार आहे. बावनदी पूल ते साखरपादरम्यान सुमारे आठ किमीचा दुसरा घाट आहे. हा संपूर्ण रस्ता घाटाचा असल्यामुळे ठिकठिकाणी तीव्र वळणे आहेत. त्यामुळे अशा वळणांवर वेग नियंत्रित न झाल्यास वाहने सरळ खांबावर धडकण्याची भीती आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे माजी सभापती जयसिंग माने यांनी हे खांब तातडीने तिथून काढून महामार्गापासून काही अंतरावर उभे करावेत, असे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.