कोकण

... तर भाजपच्या उमेदवारांना आधीच विजयी जाहीर करा

CD

...तर भाजपच्या उमेदवारांना
आधीच विजयी जाहीर करा

डॉ. परुळेकरांची उपरोधिक टीका

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल बघता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही नगरपालिका आणि एका नगरपंचायतीमध्ये भाजपचेच नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक निवडून आलेत, असे निवडणूक आयोगाने आधीच जाहीर करावे. निदान निवडणूक प्रक्रियेचा कोट्यवधी रुपयांचा जनतेचा खर्च तरी वाचेल, असा उपरोधिक टोला ठाकरे शिवसेना पदाधिकारी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी लगावला.
डॉ. परुळेकर यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध दिले आहे. त्यात म्हटले आहे, ‘महाराष्ट्रात होत असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल काय लागणार, हे आताच सांगणे सहज सोपे आहे. कारण बिहारमध्ये ७ कोटी ४२ लाख अधिकृत मतदार असताना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर या दोन चरणांमध्ये एकूण ७ कोटी ४५ लाख मतदारांनी हक्क बजावल्याचे दिसते. एकूण मतदारांपेक्षा तीन लाख मतदान जास्त झाल्याचे दिसून येत आहे, हे आश्चर्यकारक आहे. असाच प्रकार जर महाराष्ट्रात होणार असेल तर निवडणुका घेण्याचा फार्स कशाला? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही नगरपालिका आणि एका नगरपंचायतीमध्ये भाजपचेच नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक निवडून आले, असे निवडणूक आयोगाने जाहीर करावे. निदान निवडणूक प्रक्रियेचा कोट्यवधी रुपयांचा जनतेचा खर्च तरी वाचेल, असे त्यांनी म्हटले आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

पाकिस्तानात गेलेल्या भाविकांच्या तुकडीतून महिला बेपत्ता; थेट धर्मांतर करुन लग्न केल्याचा दावा

Nivrutti Maharaj Indurikar Statement Video : इंदुरीकर महाराजांचं भर किर्तनातच टीकाकारांना चॅलेंज म्हणाले, ‘मुलीचं लग्न याहीपेक्षा टोलेजंग करणार, बघू..’’

SCROLL FOR NEXT