rat16p20.jpg-
04759
रत्नागिरी ः शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे.
----------
घाई निवडणुकीची, अन् रस्त्यांच्या डांबरीकरणाची
रत्नागिरी शहर होणार खड्डेमुक्त ; निवडणुकीत लाभ होणार का?
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ः परतीचा पाऊस लांबल्यामुळे रत्नागिरी शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामात अडचण येत होती. पाऊस थांबल्यानंतर तात्काळ कामे हाती घेतली असून काही दिवसात शहरातील प्रमुख रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत. सध्या शहरात नगरपालिका निवडणुकीची घाईगडबड सुरू असतानाच रस्त्यांचे डांबरीकरण सुरू झाल्याने त्याचा लाभ सत्ताधाऱ्यांनी होईल का, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
यंदा रत्नागिरी पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यात परतीचा पाऊस लांबल्याने रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे कामही लांबणीवर पडले होते. रत्नागिरी शहरात साळवी स्टॉपपासून ते मिऱ्यापर्यंत सर्वच रस्ते खड्ड्यांनी भरलेले होते. त्याविरोधात नागरिकांसह शहरात विविध कामासाठी येणाऱ्यांकडून खड्ड्यांविरोधात टिकटिपण्णी केली जात होती. सोशल मीडियावर तर अनेकांकडून प्रशासनाला धारेवर धरले जात होते, तर लोकप्रतिनिधींना लक्ष्य केले जात होते.
ही कामे लवकरात लवकर हाती घेतील जावीत यासाठी सतत मागण्या केल्या जात होत्या.शहरातील राम आळी येथील रस्त्याची दुरवस्था झालेली होती. याबाबत शहरातील व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले होते. त्यानुसार राम आळीतील रस्ते डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. रस्त्याची कामे मंजूर असून प्रशासकीय मंजुरीही मिळालेली आहे. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही कामे सुरू असल्याने त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.