साडे सातची रत्नागिरी-देवरूख
बस बंद केल्याने प्रवाशांचे हाल
तुळसणी, निवे, आंबवच्या ग्रामस्थांना फटका; प्रशासनाचे दुर्लक्ष
साडवली, ता. २१ ः रत्नागिरीहून सात वाजता देवरूख बस सुटते ती निव्याला पूर्वी आठ वाजता यायची. त्यानंतर रत्नागिरीहून साडे सात वाजता दुसरी बस सुटायची. त्यामुळे दोन्ही बसमध्ये प्रवासी विभागल्याने गर्दी नसायची; मात्र आता साडेसातची रत्नागिरी-देवरूख बस बंद झाली. त्यामुळे सात वाजता सुटणाऱ्या बसने सर्व प्रवासी येत असल्याने प्रवासी, विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. या संदर्भात आंबव कॉलेज, निवे आश्रमशाळा व पंचक्रोशीच्या सरपंचांनी निवेदन दिले तरी रत्नागिरीहून साडेसात वाजता सुटणारी बस सुरू केली जात नाही.
सात वाजल्यानंतर रत्नागिरीहून आठची बस सुटते. तिला देवरूखला येणाऱ्या रत्नागिरीच्या कर्मचाऱ्यांची गर्दी असल्याने ती निवेपासून पुढे कोठेही थांबत नाही. इतर लोकल येणाऱ्या बसेस अनेकवेळा देवरूखमधून उशिरा सोडल्या जातात. त्यामुळे तुळसणीपासून पुढे जाणाऱ्या सर्व लोकांची गैरसोय होते. रत्नागिरीहून सात वाजता सुटणारी रत्नागिरी-देवरूख बस एकच असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रत्नागिरीहून सुटणारी साडेसातची बस पूर्ववत करावी किंवा या मार्गांवर अन्य पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. देवरूख आगारात वारंवार निवेदन देऊनही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नेमकी दाद कुणाकडे मागायची, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.