कोकण

गिर्येतील आंबा संशोधन केंद्र नावापुरतेच

CD

05886

गिर्येतील आंबा संशोधन केंद्र नावापुरतेच

डॉ. रविकांत नारकर ः शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात नसल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २१ ः गिर्ये-रामेश्वर (ता.देवगड) आंबा संशोधन केंद्रात कोणतेही संशोधन होत नाही, शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन केले जात नाही, हे केंद्र केवळ नावापुरते सुरू आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांसमोर फळमाशीसह विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव रोखायचा कसा? असा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने या केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेऊन यामध्ये तात्काळ सुधारणा करावी, अशी मागणी सुराज्य अभियान सिंधुदुर्गचे समन्वयक डॉ. रविकांत नारकर यांनी आज पत्रकार परिषदेतून केली.

सुराज्य अभियान सिंधुदुर्गतर्फे आज येथील पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सत्यवान कदम, राजेंद्र पाटील, देवगड तालुक्यातील आंबा व्यापारी दीपक वारीक, विकास दीक्षित, रवींद्र कारेकर, अशोक करगुटकर उपस्थित होते.
डॉ. नारकर म्हणाले, ‘दरवर्षी फळमाशी, तुडतुडा यासारख्या रोगाच्या प्रादुर्भावाने आंबा पिकाचे अतोनात नुकसान होते. असे असताना गिर्ये-रामेश्वर आंबा संशोधन केंद्रात काहीही उपयुक्त काम होत नाही. दहा वर्षांत येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर पाच कोटीहून अधिक निधी खर्च होऊनही येथे कोणतेही संशोधन झाले नाही आणि आंबा उत्पादकांना काहीही फायदा होत नाही. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही ऐन आंबा पिकाचा हंगाम सुरू होतानाच गिर्ये रामेश्वर येथील आंबा संशोधन केंद्रातील अधिकारी आठ दिवसांपासून गायब आहेत. संशोधन केंद्राला संपर्क करण्याची कोणती सुविधाच नाही. संबंधित अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक नंबरवरच संपर्क करावा लागतो. परंतु, तो उचलला जात नाही. अशा प्रकारे येथे चुकीचे कामकाज सुरू आहे. यामुळे फळ बागायतदारांचे अतोनात नुकसान होत आहे.’
श्री. दुधवडकर म्हणाले, ‘आंबा पिकाबद्दल तसेच रोगाच्या प्रादुर्भावांबाबत शेतकऱ्यांना माहिती हवी असल्यास ती मिळू शकत नाही. पत्रव्यवहार करूनही फळमाशी व कीड रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्याही प्रभावी औषधाचे संशोधन केलेले नाही.’
---------
कायमस्वरूपी हेल्पलाइन क्रमांक हवा!
खाडिलकर म्हणाले, ‘आंबा पिकावर येणारे आजार आणि एकूणच हंगामात घ्यावयाची काळजी याविषयी एक कायमस्वरूपी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करावा. अधिकारी बदलला की फोन नंबर बदलतो. जिल्ह्यातील आंबा पिकावर कोणती औषधे वापरायची? ती कशी वापरायची? आणि ती वापरल्यानंतर बाग कशी तयार होते? याची नमुना बाग ७३ एकरच्या या संशोधन केंद्रात निर्माण होणे काळाची गरज आहे. तेथे जाऊन शेतकऱ्यांना अभ्यास करणे सोईचे होईल. तशी बाग अद्याप तयार झाली नाही. मात्र, येथे ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली दिसते.’
-------------
कामकाजाचा आढावा घ्यावा
कोट्यवधी रुपये खर्चून निर्माण केलेल्या संशोधन केंद्रात कोणते संशोधन केले? त्याचा आंबा बागातदार शेतकऱ्यांना किती फायदा झाला? याचा शासनाने आढावा घ्यावा व येथील कामकाजात सुधारणा करावी तरच ज्या उद्देशाने हे संशोधन केंद्र निर्माण केले त्याचे फलित दिसून येईल, असे उपस्थित आंबा बागायतदारांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government: गृहखातं हातातून निसटलं, पण 'हे' मलाईदार विभाग नितीश कुमारांच्या 'जेडीयू'कडे

Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म

Gadchiroli News : मारेदुमिल्ली जंगलातील चकमक ‘खोटी कथा’; आमच्या कार्यकर्त्यांना बनावट एनकाउंटरमध्ये मारले—माओवादी पत्रकाचा आरोप!

Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसायाचं रॅकेट उघडकीस, हॉटेलवर पोलिसांचा छापा; विदेशी महिला अटकेत

Gadchiroli News : शरणागतीनंतर नवजीवनाची पहाट; अर्जुन–सम्मी दाम्पत्याला पुत्ररत्न, पुनर्वसन योजनांचा गडचिरोलीत उज्ज्वल परिणाम!

SCROLL FOR NEXT