-rat२८p२१.jpg-
२५O०७२०४
शीळ धरण
----
रत्नागिरीचा रागरंग----------लोगो
रत्नागिरीकर ३८ वर्षांपासून तहालेलेच!
रत्नागिरीत १९८७ ला मंत्रिमंडळ बैठकीवेळी शहरवासियांना पाणीटंचाईची झळ बसल्यावर शीळ पाणीयोजनेचा विचार झाला. आज ३८ वर्षांनंतरही कोट्यवधी रुपये खर्च होऊन रत्नागिरीकरांना पुरेसे पाणी मिळत नाही. रत्नागिरी शहरात निधीची कमतरता नसून, दूरदृष्टीच्या योग्य नियोजनाचा अभाव दिसून येत आहे, जो सध्याच्या निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरलेला आहे.
- अभिजित हेगशेट्ये, रत्नागिरी
---
महाराष्ट्र सरकारची मंत्रिमंडळ बैठक प्रथमच रत्नागिरी येथे होत होती. १९८७चा काळ, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. आरोग्यमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री भाई सावंत होते. रत्नागिरीचे नगराध्यक्ष होते अनंत जाधव. अत्यंत मुत्सद्दी आणि भल्याभल्यांना पाणी पाजत नगराध्यक्षपदावर विराजमान झालेली अस्सल राजकीय व्यक्तीमत्व. कोकणात प्रथमच सारे मंत्रिमंडळ येणार होते. त्यांचे स्वागत आणि हॉस्पिटॅलिटीची जबाबदारी अनंतशेठ जाधव यांनी अत्यंत उत्तमपणे पार पाडली. या निमित्ताने रत्नागिरीत मंत्रिमंडळ येत असताना कोकण आणि रत्नागिरीच्या विकासाची प्रक्रिया सुरू होईल, असा आशावाद रत्नागिरीत जागवला गेला होता. प्रत्यक्षात तसे कोणतेच ठोस निर्णय झाले नाहीत. मंत्रिमंडळ बैठकीत संपूर्ण नगरपालिका प्रशासन गुंतल्याने रत्नागिरीकरांना दोन-तीन दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागले. तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. हा प्रश्न वृत्तपत्रात गाजल्यानंतर आरोग्यमंत्री भाई सावंत यांनी याची गंभीर दखल घेत रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शीळ धरण योजनेच्या विचाराचा प्रस्ताव चर्चेत आणला. या घटनेला ३८ वर्षाचा कालावधी झाला; मात्र रत्नागिरी शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे तो आजही योग्य नियोजनाच्या कात्रीत चाचपडत आहे. सध्याच्या नगरपालिका निवडणुकीत आम्हाला पिण्याचे मुबलक पाणी द्या, अशी आर्जवी मागणी मतांसाठी फिरणाऱ्या प्रत्येक नगरसेवक आणि नगराध्यक्ष उमेदवाराला सामोरी जात आहे. रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष रवींद्र सुर्वे यांचा पाच वर्षाचा अखंड नगराध्यक्षपदाचा कालखंड हा शहराच्या मुलभूत विकास प्रक्रियेच्या नियोजनाचा महत्त्वाचा कालखंड मानला जातो. मंत्रिमंडळ बैठकीला पाणीटंचाईची लागलेली झळीची दखल भाई सावंत यांनी गांभीर्याने घेतली. नाचणे तलाव आणि पानवल धरणावर अवलंबून असणाऱ्या शहराच्या पाणीपुरवठ्याला पहिला व्यापक दृष्टिकोन दिला तो रवींद्र सुर्वे यांच्या कारकिर्दीत. शीळ धरणातून रत्नागिरी शहराला पाणी आणण्याची योजना त्या काळात आखली गेली. मागील ३७-३८ वर्षात हे शहर वेगाने वाढले. कोकण किनारपट्टीवरील कोट्यवधीची मत्स्योद्यागातील आर्थिक उलाढाल करणारे, आंबा, काजू या फलोत्पादन क्षेत्रातील जागतिक नामांकन असणारे पर्यटनक्षेत्रात देश-परदेशातील पर्यटकांना खेचून आणणारे हे शहर फार वेगाने वाढत आहे. मुंबई-गोवा महामार्ग १५ वर्षे रखडला तरी कोकण रेल्वेची वेगवान आणि आरामदायी सेवा याने पर्यटनात विलक्षण वाढ झाली आहे. मुंबई-पुण्याचे रत्नागिरी सेकंड होम होत आहे; मात्र आजही येथील पिण्याच्या पाण्याची समस्या तितकीच गंभीर आहे. मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कारकिर्दीत देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने रत्नागिरीच्या ६० कोटी रुपये शीळ पाणीयोजनेसाठी खर्च झाले. पुन्हा त्यावर २० ते २५ कोटी नव्याने खर्च झाले. तरीही पिण्याच्या पाण्याचे नियोजन नाही. जनतेला पाणी योग्य प्रकारे मिळत नाही. यातील महत्त्वाचा प्रश्न आर्थिक निधी उपलब्धतेचा नाही. त्यासाठी येथील आमदार, मंत्रिमहोदय अत्यंत सक्षम आहेत. प्रसंगी दुप्पट निधी उपलब्ध करण्याची त्यांची क्षमता आहे. प्रश्न आहे तो योग्य नियोजनाचा, त्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.