कोकण

पैशांनी विकले जाणारे सावंतवाडीकर नव्हेत

CD

07828

पैशांनी विकले जाणारे
सावंतवाडीकर नव्हेत

एकनाथ शिंदे ः माझा अजेंडा विकासाचाच


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः स्वाभिमानी सावंतवाडीकरांना कुणी विकत घेऊ शकत नाही, पैशांनी विकले जाणारे सावंतवाडीकर नाहीत. मुख्यमंत्री असताना १९० कोटी शहरासाठी मी दिले. शहराचा विकास करण्यासाठी हक्काचा नगरसेवक व नगराध्यक्ष हा शिवसेनेचा हवा. कोकणी माणसं साधी भोळी असली तरी निश्चय केल्यावरही मागे हटत नाहीत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता.३०) येथे केले. नगरपरिषद ही नगरविकास खात्याच्या अखत्यारीत येतात. तुमचा एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आहे, त्यामुळे जे प्रस्ताव माझ्याकडे येतील ते मंजूर करत भरघोस निधी दिला जाईल. मी जे बोलतो ते करतो, असेही ते म्हणाले.
येथील गांधी चौकात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. व्‍यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, राज्य सचिव राजेश मोरे, जिल्हाप्रमुख संजू परब, तालुका प्रमुख दिनेश गावडे, नगराध्यक्ष पदाचे उमेदार ॲड. निता कविटकर, अशोक दळवी आदी उपस्‍थित होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘कोकण आणि शिवसेना कुणी वेगळा करू शकत नाही. आमदार दीपक केसरकर यांच या शहरातील जनतेवर प्रेम आहे आणि तेवढंच प्रेम चारवेळा आमदार करून त्यांना सावंतवाडीकरांनी दिलं. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. ही निवडणूक छोटी असली तरी सावंतवाडीचे भविष्य ठरविणारी आणि विकास घडविणारी आहे. मुख्यमंत्री असताना मी १९० कोटी सावंतवाडी शहराला दिले. जिथे संकट तिथे एकनाथ शिंदे पोहोचतो. मी जे बोलतो ते करतो. माझा अजेंडा हा विकासाचा आहे. पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न आहे. तरूण नोकरीसाठी बाहेर जाऊ नये ही माझी भूमिका आहे.’

केसरकर म्‍हणाले, ‘राजघराण्याचा आदर ठेवणे म्हणजे, तत्वाला तिलाजंली देणे नव्हे. आज हॉस्पिटल, मोती तलाव, रेस्ट हाउस आमचंचं असल्याचे ते म्हणतात. मात्र, पुण्यश्लोक बापुसाहेब महाराजांचा वारसा जपा आणि नंतरच जनतेकडे मते मागा. मल्टिस्पेशालिटीसाठी १० वेळा त्यांच्याकडे गेलो. मात्र, जाचक अटींमुळे हा प्रश्न सुटला नाही. मात्र, आता जर स्वाक्षरी दिल्या नाहीत तर कोर्टात जाऊ व तिथेच हॉस्पिटल बांधू, आज मोती तलावावर खटला सुरू आहे. उद्या घरची सुन विरोधात जाणार का? मोती तलाव पालिकेचाच राहणार नाही. त्यामुळे आधी खटला मागे घ्या, मग मत लोकांकडे मागा.’
ते पुढे म्हणाले, ‘विकासाच्या गोष्टी बाहेरच्या लोकांनी आम्हाला सांगू नयेत. ज्यांना सावंतवाडीची माहिती नाही ते विकास काय करणार? लोकांच्या जमिनी बळकवणारे लँण्ड माफिया शहर ताब्यात घेऊ पाहतात. माझ्या आमदारकीच्या निवडणुकीतही त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शहराने मला निवडून दिले. आज योगायोगाने अशांचे कार्यालय शहराबाहेर आहे. सावंतवाडीकरांनी अशा प्रवृत्तीला शहरात घेऊ नका. सावंतवाडी शहर माझं घर आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हे शहर माफीयांच्या हाती जाऊ देणार नाही.’
-------------
माझं, राणेंचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न
यूतीसाठी आम्ही आग्रही होतो. खासदार नारायण राणेंचेही त्‍यांनी ऐकलं नाही. आज काही ठिकाणी अपक्ष उमेदवार दिलेत. मत विभागणीसाठी हा प्रयत्न आहे. नारायण राणेंचही त्यांनी ऐकलं नाही. नारायण राणे आणि माझं नेतृत्व त्यांना संपवायचंय, आणि स्वतःच नेतृत्व उभं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा लोकांचे नाव घेऊ इच्छित नाही, असेही श्री. केसरकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EU takes action against IRGC : युरोपियन युनियनने ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी संघटना केलं घोषित!

Arijit Singh Possible to enter in Politics : अरिजीत सिंह राजकारणात करतोय एन्ट्री? ; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

Ajit Pawar : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अर्पण केली श्रद्धांजली, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले

T20 World Cup 2026 जिंकून सूर्यकुमारच्या नेतृ्त्वात टीम इंडिया इतिहास घडवणार? रवी शास्त्री म्हणाले, '१० मिनिटांचा खेळ...'

SCROLL FOR NEXT