कोकण

रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्गाचे ८९ टक्के काम पूर्ण

CD

०८४५७
मुंबई-गोवा महामार्गाचे ८९ टक्के काम पूर्ण
राष्ट्रीय महामार्ग विभाग ; संगमेश्वर, रत्नागिरी, लांज्यातील ११ किमीचे काम शिल्लक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने गती घेतली आहे. अनेक ठिकाणच्या जागेचा प्रश्न सुटला असून, आतापर्यंत जिल्ह्यातील महामार्गाचे ८९ टक्के काम पूर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण, भराव आणि पाच पुलांचे काम शिल्लक आहे. सर्व्हिस रोडसह काही ठिकाणी महामार्गाची रचना सहापदरी झाली आहे. आता संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा भागातील सुमारे ११ किमी काम शिल्लक आहे, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता राजन कुलकर्णी यांनी सांगितले.
महामार्गाचे जिल्ह्यातील सुमारे २१३ किमीचे काम आहे. पाच टप्प्यामध्ये हे काम सुरू होते. त्यापैकी ३ टप्पे पूर्ण झाले आहे. संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा तालुक्यातील काही टप्प्यांचे काम रखडले आहे. यामध्ये अनेक ठिकाणी जागेचा प्रश्न होता. काही ठिकाणी मंदिराचा प्रश्न, तर काही ठिकाणी घरांचा प्रश्न असल्याने या टप्प्यातील कामाला विलंब झाला आहे. हे प्रश्न आता सुटले असून, कामाने गती घेतली आहे. संगमेश्वर-धामणी येथील १७० मीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. कुरधुंडा फाटा या भागातील काम पूर्ण झाले आहे. खापरेवाडी या ठिकाणी महामार्गाचे काम सध्या चालू आहे.​ कोळंबे येथे ७०० मीटर लांबीच्या भरावाचे काम चालू आहे. हे काम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होईल. तळेकांटे या ठिकाणी भरावाचे काम पूर्ण झाले आहे. कसबा येथील महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी ९ कुटुंबांना निधी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
निवळी येथे पुलाचे पिलर पूर्ण झाले; मात्र त्यावर गर्डर टाकण्याचे काम शिल्लक आहे. कोकजेवठार येथेही काही अडचण दूर झाल्यास तिथेही काम वेगाने सुरू आहे. धोकादायक ठरलेल्या हातखंबा गावातील तीव्र उताराच्या रस्त्यावरही पर्याय काढला असून, तेथे दोन्ही बाजूंनी गावात उतरण्यासाठी अंडरपास रस्ता ठेवण्यात आला आहे. मुख्य पुलासह अंतर्गत दोन छोटे पूल बांधण्यात येणार आहेत. पाली येथील उड्डाण पुलाचे काम वेगाने सुरू असून, त्यावर गर्डर तयार आहेत आणि लवकरच १४ गर्डर टाकण्याचे काम सुरू होईल.
प्रशासन आणि कंत्राटदार कंपन्यांनी उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी लक्ष्य निश्चित केले आहे. ​पाली येथील काम एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ​संगमेश्वर, लांजा आणि बावनदी येथील क्षेत्रातील कामे पुढील २ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. संगमेश्वर, बावनदी, लांजा, पाली, हातखंबा या पाच पुलांचे काम शिल्लक आहे.


येथे होणार ६ पदरी महामार्ग
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथे सर्व्हिस रोड धरून हा मार्ग सहापदरी होणार आहे. चौपदरीकरणामध्ये मुंबईकडून येताना रत्नागिरीत वळण्यासाठी स्वतंत्र सर्व्हिस रोड आहे, तर गोव्याकडून येताना रत्नागिरीत येण्यासाठी स्वतंत्र सर्व्हिस रोड आहे.

एप्रिल २०२६ पूर्वी पूर्ण ः नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण एप्रिल २०२६च्या आत पूर्ण केले जाईल. यात कोणतीही दिरंगाई होणार नाही, असा शब्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना दिला. महामार्गाचे काम नेमके पूर्ण कधी होणार? या खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर गडकरींनी ही ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT