कोकण

‘त्या’ ९७० शेतकऱ्यांना भरपाई द्या

CD

10900

‘त्या’ ९७० शेतकऱ्यांना भरपाई द्या

सावंत, नाईक ः जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १५ ः वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसानीची रक्कम मिळवून द्या, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेत आज केली.
जिल्ह्यातील ९७० शेतकऱ्यांना अजूनही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर माजी आमदार नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सावंत यांनी आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची ओरोस येथे भेट घेऊन वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसानीची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी केली. या मागणीवर जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री ननावरे, भारतीय कृषी विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक अतुल झनकर, विमा कंपनीचे अधिकारी विरेश अंधारी व संकेत नाईक उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना नाईक व सावंत म्हणाले, ‘गेली ३ ते ४ वर्षे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमवेत आम्ही पाठपुरावा करत असल्याने विमा कंपनीकडून फळपीक विम्याची जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यात यशस्वी होत आहोत. मागील वर्षी २०२४-२५ मध्ये सुमारे ४२ हजार शेतकऱ्यांनी फळपीक विमा उतरविला होता. मात्र, त्यातील ९७० शेतकऱ्यांना अजूनही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना फळपीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘यावर्षी २०२५-२६ मध्ये देखील सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांनी काजू आणि आंबा पिकांचा फळपीक विमा उतरविला आहे. त्याचे नुकसानीचे टिगर दर महिन्याला जाहीर करावेत. तसेच दर महिन्याला याबाबतची आढावा बैठक घ्यावी. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही केली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून विमा कंपनीनेही १५ जूनपर्यंत टिगरच्या आधारे नुकसानीची रक्कम जाहीर करण्याचे मान्य केले आहे. २०२५-२६ चा फळपीक विमा भरण्यासाठी राज्याने १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचे सांगितले होते. मात्र, त्याबाबतचा कुठलाही आदेश कृषी विभागाकडे न आल्याने ही मुदतवाढ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली नाही. यावर नाराजी व्यक्त करत फळपीक विमा योजनेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आम्ही केली आहे.’
-----------------
हवामान केंद्रांचा आढावा घ्यावा
हवामानाचे मोजमाप करण्यासाठी ५६ हवामान केंद्रे आहेत. मात्र, त्यातील काही नादुरुस्त आहेत. त्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हवामान केंद्र सुरु करण्यासाठी शासनाने जीआर काढला आहे. त्याच्या पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्याची देखील विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याचे नाईक व सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT