कोकण

मुंबई-गोवा महामार्ग फेब्रुवारी २०२४ मध्ये सेवेत?

CD

महामार्ग रुंदीकरणाचे काम
पुढील फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार
राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबई-गोवा महामार्गावरील दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. फेब्रुवारी २०२४ म्हणजे आगामी वर्षभरात काम पूर्ण होईल, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली आहे.

मागील कित्येक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते ओवेस पेचकर यांनी केली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. राज्य सरकार आणि प्राधिकरणच्या वतीने न्यायालयात कामासंबंधित अहवाल सादर करण्यात आला. खंडपीठाने यावर समाधान व्यक्त केले. मागील अनेक वर्षे महामार्ग दुरुस्ती आणि चौपदरीकरण काम सुरू आहे; परंतु येथील खड्डे आणि दुरुस्ती पूर्ण होत नाही. तसेच प्रकल्प खर्चात देखील वाढ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रत्येक अपघाताला सरकार जबाबदार कसे?
महामार्गावरील ट्रक अपघाताची माहिती यावेळी याचिकादारांनी दिली; मात्र संबंधित घटनेत ट्रकचालक वेगाने आला होता. त्यामुळे या अपघाताला सरकार जबाबदार कसे, असे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. त्यामुळे खंडपीठाने याला सहमती दिली. प्रत्येक अपघातात सरकार जबाबदार असू शकत नाही, चालकही वेगाने गाडी चालवतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. महामार्गावर सुरक्षा साधने आणि फलक आहेत का, याची चाचपणी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shalinitai Patil Passes Away: माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं मुंबईत राहत्या घरी निधन

BMC Election: मुंबईतील भाजपचा 'हा' अभेद्य किल्ला ठाकरे बंधू जिंकणार का? मारवाडी, गुजराती आणि जैन मतदारांच्या हाती निर्णय

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या, एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT