कोकण

बाप्पा पावला ! गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी आहे. मुंबई - कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात खासगी वाहनांनी जाणाऱ्या वाहनचालकांनी पोलीस ठाण्यातून टोल पास घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

कोकणात जाणाऱ्या रस्त्यांच्या स्थिती संदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात बैठक झाली होती. या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा, यासाठी मुंबई - कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबरपर्यंत टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासंबंधीचा शासन निर्णय आज सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला आहे. 

गणेशोत्सवासाठी मुंबई - पुणे - कागलमार्गे कोकणात जाणाऱ्या भाविकांना स्टिकर पास देण्यात येणार आहेत. हा पास 12 सप्टेंबररोजी परतीच्या प्रवासात ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच,  मुंबई - पुणे प्रवासात व पुणे - कोल्हापूर कागल मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई (वाशी), पुणे - मुंबई एक्सप्रेस वे, किणी, आनेवाडी येथील पथकर नाक्यांवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. याबाबतच्या सुचना शासन निर्णयानुसार संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : पाच महिन्याच्या गर्भवतीनं जीवन संपवलं; शेवटच्या पत्रात धक्कादायक खुलासा, नेमकं काय लिहिलं?

सैराटमध्ये परश्यासोबत पहिल्यांदा दिलेल्या इंटिमेंट सीन बद्दल बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली...'मी घाबरुन...'

Latest Marathi News Live Update : शेळ्या-बोकडांवर पाळत ठेवत चोरी करणाऱ्या बोकड चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी केली अटक

Rule Change: एलपीजी, पॅन-आधार अन्...; १ जानेवारी २०२६ पासून 'हे' नियम बदलणार, सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

Chhatrapati Sambhajinagar News : दिल्लीतील पथसंचलनासाठी अक्षता मुळे हिची निवड; पाच वर्षांनंतर मिळाला मान

SCROLL FOR NEXT