tourism of amboli start and increased fastly now a days in sindhudurg 
कोकण

आंबोली गजबजतंय पर्यटकांनी ; अर्थकारणाला मिळतीये गती

सकाळ वृत्तसेवा

आंबोली (सिंधुदुर्ग) : लॉकडाउननंतर आता आंबोली पर्यटन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली. मुख्य म्हणजे येथे कोरोनाची भीती आता संपल्यात जमा आहे. यामुळे पर्यटन व्यावसायिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला. आंबोलीत यंदाही गेल्या वर्षीएवढा सरासरी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाऊस आणि कोरोना यांना वैतागलेल्या येथील स्थानिकांना आता थोडा दिलासा मिळाला.

हॉटेल व्यवसायही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पर्यटन व्यावसायिक आता पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले. लॉकडाउन संपल्याने आता वेगवेगळ्या भागातून पर्यटक गोव्यात जाताना येथे थांबू लागले आहेत. आंबोलीत रहायलाही पर्यटक येऊ लागले आहेत. त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिक समाधान व्यक्त करीत आहेत.

आंबोलीत पर्यटनदृष्ट्या अनेक बाजूंनी विकास करण्यासाठी राज्यकर्त्यांना अपयश आले तरी निसर्गावर अवलंबून पर्यटन मात्र अजून टिकून आहे. त्यामुळे आंबोलीचे आकर्षण कायम आहे. त्यामुळे गेले ८ महिने जवळपास बंद असलेला इथला हॉटेल व्यवसाय आता रुळावर येत आहे.

पर्यटकांमध्येही कोरोनाची भीती आता राहीली नसल्याचे चित्र आहे. अजूनही मुक्कामाचे प्रमाण खूप वाढलेले नाही; मात्र पर्यटक येथे काहीकाळ थांबणे पसंत करत आहेत. यामुळे खाण्यापिण्याशी संबंधित उलाढाल वाढली आहे. त्यामुळे अर्थकारणाला हळूहळू गती येत आहे.

"आंबोलीत सध्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. कोरोनाचा कोणताही मागमूस पर्यटनावर दिसून येत नाही. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आंबोलीत पर्यटन व्यावसायिकांत चैतन्य दिसून येते. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे."

- प्रथमेश गवंडे, पर्यटन व्यावसायिक, आंबोली

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT