Vaccination esakal
कोकण

Vaccination Update: रत्नागिरीत तीन दिवसांची मोहिम यशस्वी

- राजेश शेळके

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) विधानसभा मतदारसंघामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या पुढाकारातून गेली तीन दिवस सुरू असलेली लसीकरणाच्या (vaccination)मोहिम आज संपली. यामध्ये ६ हजार ५७२ जणाचे लसीकरण करण्यात आले. स्वामी समर्थ मंगल कार्यालयात १ हजार ७५५ तर सर्वांत कमी ५०८ जणांचे लसीकरण मिरकरवाडा केंद्रावर (Mirakwada Center) झाले.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे सुरक्षित लसीकरण होणे आवश्यक होते. कोरोना संसर्ग रोखायचा असले तर योग्य खबरदारी व लसीकरण हेच दोन प्रभावी मार्ग आहेत. जास्तीत जास्त नागरिकांचे जलद गतीने लसीकरण व्हावे, या उद्देशाने मंत्री उदय सामंत यांनी ही तीन दिवसाची लसीकरण मोहिम हाती घेतली.

उदय सामंत यांच्या पुढाकाराने रत्नागिरीत पाच ठिकाणी हे लसीकरण झाले. याचे सर्व नियोजन युवा सेनेकडे दिले होते. अतिशय सुटसुटीत आणि नियोजनबद्ध हे लसीकरण झाले. शहरातील साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय, माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालय, आठवडा बाजार येथील केतन मंगल कार्यालय, खालची आळी येथील भैरव मंगल कार्यालय, मिरकरवाडा येथील पालिकेची शाळा क्रमांक १० या पाच ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ७ ते ९ जुलै या कालावधीत ही मोहीम सुरू होती. यामध्ये १८ ते २९ वयोगटातील तरुण, तरुणींचे लसीकरण करण्यात आले.

पहिल्याच दिवशी बुधवारी (ता. ७) पाचही केंद्रांवर १ हजार ७९९, आठ तारखेला २ हजार ४४८ नऊ तारखेला २ हजार ३२५ अशा प्रकारे तीन दिवसात ६ हजार ५ ७२ जणांचे लसीकरण करण्यात आले. आपल्या मतदरासंघातील मतदरांना सुलभ लसीकरण होण्यासाठी मंत्री सामंत यांनी हा उपक्रम हाती घेतला. महाराष्ट्रातील हा पहिल्या उपक्रम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून नोंदणी घेऊन, ज्या केंद्रावर जेवढे डोस उपलब्ध होते. तेवढ्याच लोकांना फोन करून बोलावून घेतले जात होते. त्यामुळे कोणतीही गर्दी न होता सुटसुटीत पद्धतीने हा लसीकरणाचा कार्यक्रम झाला.

पहिल्या दिवशी पाचही केंद्रांवर १ हजार ७९९

दुसऱ्या दिवशी २ हजार ४४८

तिसऱ्या दिवशी २ हजार ३२५

एकूण- ६ हजार ५ ७२ जणांचे लसीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT