कोकण

स्वाभिमान पक्षाची अवस्था ना घर का ना घाट का - विनायक राऊत

राजेश कळंबटे

रत्नागिरी - स्वाभिमान पक्षाची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. त्याची अस्तित्वासाठी सुरु असलेली चूळबुळ आम्हाला गांभीर्याने घ्यायची गरज वाटत नाही. ज्यांच्यावर कोणतेही संस्कार नाहीत, अशा हैवानी विचाराच्या लोकांनी केलेल्या वक्तव्यांवर आम्हाला उत्तर द्यायची गरज वाटत नाही. त्यांचे मतदारच विसर्जन करतील, असा विश्‍वास शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त करत नारायण राणेंना लक्ष्य केले.

शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनेपुढे स्वाभिमानचे आव्हान असूच शकत नाही. लोकसभा मतदारसंघात ज्यांचा एकच आमदार आहे. त्यांचे आमच्यापुढे काहीच चालणार नाही. शिवसेना जिल्हा परिषद ते ग्रामपंचातीपर्यंत पक्ष पोचला आहे. रत्नागिरीत तर त्यांचे काहीच नाही. स्वाभिमान वगळता अन्य पक्षातून आमच्याकडे येणार्‍यांची संख्या अधिक आहे. त्यांना आम्ही लवकरच धक्का देणार आहोत.

भाजपसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या सर्वच प्रश्‍नांबाबत राऊत यांनी सावधगिरीने उत्तरे दिली. ते म्हणाले की, युतीबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे योग्यवेळी जाहीर करतील. भाजपनेही जागा वाटपावर जास्त विचार न करता राज्यातील महत्त्वाचा प्रश्‍न बनलेल्या शेतकरी आत्महत्येवर लक्ष केंद्रीत करावे. पंढरपूरच्या महासंमेलनात पक्षप्रमुखांनी महाराष्ट्राला दुष्काळातून मुक्त करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. शेतकरी, फळ उत्पादकांना न्याय देण्यासाठी निर्णय घ्यावेत अशी मागणी शिवसेना करित आहे. भाजप आमचे ऐकेल सध्या आम्हाला शासनाची गरज आहे.

इकोसेन्सिटिव्ह झोनचा निर्णय खासदार नारायण राणे यांच्या मुळेच कोकणावर लादला गेला आहे. मोरोटेरिअममधून रत्नागिरी, सिंधुदुर्गची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यात लवकरच आम्हाला यश येईल

- विनायक राऊत, खासदार

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या विधानावर बोलणे टाळताना ते आज सकाळी आमच्याबरोबर चहाला होते असे सांगितले. लाड यांना गरज भासली की ते आमच्याकडे येतात. शिवसेना त्यांच्यामागे भक्कमपणे उभी राहिली आहे.

आगामी निवडणुकीत राम मंदिर हा शिवसेनेचा महत्वाचा मुद्दा राहील. लोकसभेतही आम्ही आवाज उठवला असून त्यावर कोणतीही तडजोड करणार नाही. त्यानंतर शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी बाजार भावाची हमी दिली पाहीजे.

- विनायक राऊत, खासदार

सामुदायिक विवाहात सहभागी होण्याचे आवाहन

खासदार राऊत म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेकांना विवाहाचा सांग्रसंगीत सोहळा करण्याची इच्छा असते; मात्र आर्थिक विवंचनेमुळे ते साध्य होत नाही. शिवसेनेतर्फे सिंधुदुर्गात 32 जोडप्यांचा सामुहिक विवाह करण्यात आला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील रत्नागिरी जिल्ह्याच्या भागातील 51 जोडप्यांचा विवाह प्रमोद महाजन क्रीडांगणावर केला जाणार आहे. यात सहभागी होणार्‍यांनी 25 जानेवारीपर्यंत खासदार संपर्क कार्यालयासह आमदार उदय सामंत, चिपळूणचे सदानंद चव्हाण आणि राजापूर आमदार राजन साळवी यांच्या संपर्क कार्यालयात नावनोंदणी करावयाची आहे. विवाहातील सर्व खर्च शिवसेना करणार आहे.

मिरकारवाडा टप्पा 2 च्या कामासाठी निधी केंद्र शासनाकडे आला आहे. तो लवकरच स्थानिक पातळीवर येईल अशी माहिती आमदार सामंत यांनी सांगितली. ते म्हणाले की सध्याच्या कामाला मुदतवाढ देऊन ते पूर्ण करायचे की त्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया काढायची यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे ते काम थांबले आहे.

उदय सामंतांचे कौतूक

आमदार उदय सामंत म्हाडा अध्यक्षपद हे फक्त मुंबईसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी असल्याचे दाखवून दिले. सामान्य लोकांना परवडतील अशी घरे मिळवून देण्यासाठी 45 टक्क्यांनी किमती कमी केल्या. त्यांचे काम कौतुकास्पद असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांना शाबासकी दिली असल्याचे राऊत यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT