Asia Cup India Pakistan Sri Lanka Boycott History Strained Political Relations
Asia Cup India Pakistan Sri Lanka Boycott History Strained Political Relations  esakal
क्रीडा

Asia Cup : भारताने श्रीलंकेतील आशिया कपवर बहिष्कार का घातला होता?

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 : आशिया कपचा थरार 27 ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू होत आहे. यंदाचा आशिया कप टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार असून आधी याचं यजमानपद हे श्रीलंकेकडे होतं. मात्र श्रीलंकेतील आर्थिक आणीबाणी पाहता त्यांनी आशिया कपचे आयोजन करण्यास नकार दिला. त्यानंतर आशिया कप हा संयुक्त अरब अमिरातीमध्ये शिफ्ट करण्यात आला आहे. आशिया कपवर श्रीलंकेतील आर्थिक आणीबाणीचा परिणाम झाला आहे. (Asia Cup India Pakistan Sri Lanka Boycott History Strained Political Relations)

तसेही आशियातील क्रिकेटिंग नेशनमधील राजकीय संबंधांचेही आशिया कपवर कायम सावट असते. आशिया कपवर बहिष्कार घालण्यात भारत आणि पाकिस्तान आघाडीवर आहेत. या दोन देशांमध्येच राजकीय संबंध हे सातत्याने विकोपाला जातात. मात्र भारताने श्रीलंकेतील आशिया कपवर बहिष्कार घातला तो वेगळ्या कारणाने.

आशिया कपची सुरूवात संयुक्त अरब अमिरातीमधून 1984 साली झाली होती. पहिला आशिया कप सुरळीत पार पडला, मात्र 1986 च्या दुसऱ्या आशिया कपवर भारताने बहिष्कार घातला. हा कप श्रीलंकेत आयोजित केला होता. मात्र त्याच्या आदल्या वर्षी श्रीलंकेत झालेल्या वादग्रस्त मालिकेमुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट संबंध बिघडले होते. यामुळेच भारताने दुसऱ्या आशिया कपवर बहिष्कार घातला होता. त्यावेळी बांगलादेशने आशिया कपमध्ये एन्ट्री केली होती.

भारतीय संघ 1985 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी संघाचे नेतृत्व कपिल देव करत होते. मात्र भारत ही मालिका हरला होता. या मालिकेतील पंचांचे निर्णय सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. याचेच कारण देत भारताने श्रीलंकेत होणाऱ्या आशिया कपवर बहिष्कार घातला. मात्र यात काळात श्रीलंकेत गृह युद्ध भडकले होते. हे देखील भारताने आशिया कपवर बहिष्कार घालण्यामागचे महत्वाचे कारण होते.

त्यानंतर आशिया कपचा चौथा हंगाम हा भारतात 1990 - 91 ला झाला. या स्पर्धेवर पाकिस्तानने भारताबरोबरचे राजकीय संबंध बिघडल्याने बहिष्कार घातला होता. त्यावेळचा आशिया कप भारताने जिंकला होता. त्यांनी अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला होता. याचबरोबर 1993 चा आशिया कप देखील भारत - पाकिस्तान यांच्यातील बिघडलेल्या राजकीय संबंधामुळे रद्द करावा लागला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT