jay shah 
क्रीडा

87 वर्षानंतर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे आयोजन रद्द; BCCI चा मोठा निर्णय

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं मोठा निर्णय घेतला असून अनेक भारतीय क्रिकेटपटूंना घडवणारी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धा रद्द केल्याचं जाहीर केलं आहे. सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे BCCI चे सचिव जय शहा यांनी ही माहिती कळवली आहे. तसेच रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज 45 हजार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देणार असल्याचं जय शहा यांनी पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे. 

महात्मा गांधींच्या प्रतिमेची अमेरिकेत तोडफोड; चेहऱ्याचा भाग गायब

कोरोनामुळे देशातील खेळाची दशा आणि दिशा बदलली आहे. एप्रिलमधील आयपीएलच्या 14 व्या सीजनचे आयोजन फिक्स आहे, अशात बीसीसीआयजवळ स्पर्धेसाठी केवळ दोन महिन्यांचा वेळ आहे. यामुळे बीसीसीआयने सर्व संघांना विजय हजारे ट्रॉफी किंवा रणजी ट्रॉफीमधून एका स्पर्धेची निवड करण्याची विनंती केली होती. 

रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमधील कोणती स्पर्धा खेळवायची याबाबत BCCI ने सर्व राज्य संघटनांना पत्र लिहून त्यांचं मत विचारलं होतं. त्यावेळी बहुतेक संघटनांनी विजय हजारे ट्रॉफी खेळवण्यास पसंती दिली होती. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) मात्र रणजी ट्रॉफी खेळवण्याच्या बाजूनं होते.

सध्या सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा (Syed Mushtaq Ali Trophy 2021) सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धा होईल. विजय हजारे ट्रॉफीमनध्ये एक दिवसाची लढत असते. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात.

दरम्यान, 1934 साली पहिल्यांदा सुरु करण्यात आलेल्या या स्पर्धेचे नाव राजकुमार आणि क्रिकेटर केएस रणजीत सिंह यांच्या नावावर ठेवण्यात आलं होतं. त्यांनी 1896 ते 1902 दरम्यान इंग्लडमध्ये 15 टेस्ट खेळले होते. क्रिकेटमधील लेट कट आणि लेग ग्लांससारख्या शॉटचे जनकत्व रणजीत सिंह यांच्याच नावावर जाते. रणजी ट्रॉफीची सर्वात यशस्वी टीम मुंबई आहे, मुबंईने 41 वेळा फायनल जिंकलं आहे. वसीम जाफर स्पर्धेचा सर्वाधिक यशस्वी खेळाडू असून त्यांच्या नावावर 10 हजार 738 धावा आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT