sai kishore esakal
Cricket

Ranji Trophy 2024 Final : तो निर्णय कर्णधाराचा! मोठ्या पराभवानंतर तमिळनाडू ब्लेम गेम सुरू

अनिरुद्ध संकपाळ

Ranji Trophy 2024 Tamil Nadu : रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीतील मुंबई विरुद्ध तमिळनाडू सामना एकतर्फी होता. मुंबईने तमिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव झाला.

तमिळनाडूचा संघ मुंबईविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत खराब खेळला. त्यामुळे मुंबईने तीन दिवसात सामना संपवून ४८व्या रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली तमिळनाडूच्या मोठ्या पराभवानंतर प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी अपयशाचे कारण सांगितले.

सामन्यानंतर, त्यांनी कर्णधार आर साई किशोरने गोलंदाजांसाठी पोषक परिस्थितीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने संघाने नाणेफेकच्या वेळी सामना गमावल्याचे स्पष्ट केले.

सुलक्षण कुलकर्णी ESPNCricinfo शी बोलताना म्हणाले की, "मी नेहमी स्पष्ट बोलतो. आम्ही पहिल्या दिवशी 9 वाजता सामना हरलो, ज्या क्षणी मी विकेट पाहिली तेव्हा मला नक्की कळले की आम्हाला काय मिळणार आहे. सर्व काही ठरले होते, आम्ही नाणेफेक जिंकली, एक प्रशिक्षक म्हणून, एक मुंबईकर म्हणून मला परिस्थिती चांगली माहीत आहे. आम्ही गोलंदाजी करायला हवी होती पण कर्णधाराचा विचार वेगळा होता.”

अपेक्षेप्रमाणे, प्रथम फलंदाजी करण्याचा टीएनचा निर्णय वाईटरित्या उलटला.आमची पहिल्या डावात 42/5 अशी अवस्था झाली होती. कमी नंतर तमिळनाडूचा डाव 146 धावांवर आटोपला. त्यानंतर, त्यांनी मुंबईला 378 धावा केल्या आणि नंतर दुसऱ्या देखील तमिळनाडीचा डाव 162 धावात संपुष्टात आला.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT