DCvsKKR
DCvsKKR IPL
क्रीडा

KKR विरुद्धच्या लढतीमुळे DC वरही आली क्वारंटाईन होण्याची वेळ

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातील दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संघातील इतर खेळाडूंना 7 दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर्स यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सोमवारी नियोजित कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोलकाता संघ सात दिवस क्वारंटाईन असल्यामुळे त्याचे सामने पुढील सात दिवस होणार नाहीत. कोलकाता नाईट रायडर्सने साखळी फेरीतील अखेरचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळला होता. बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला क्वारंटाईन रहाण्याचे आदेश दिले आहेत.

क्रिकबजच्या वृत्तानुसार, कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमशिवाय दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर्ण टीमवर क्वारंटाईनची वेळ आली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. 'कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने आमच्या विरुद्धत अखेरचा सामना खेळला होता. त्यामुळे आम्हाला क्वारंटाईनच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आमचे सर्व खेळाडू हॉटेलच्या रुममध्येच क्वारंटाईन झाले आहेत. किती दिवस क्वारंटाईन रहावे लागणार यासंदर्भात कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाने आपले प्रॅक्सिटस नियोजित कॅन्सल केले आहे. दिल्ली कॅपिटल्सचा स्पर्धेतील पुढचा सामना 8 मे रोजी कोलकाता विरुद्ध नियोजित आहे. पण आठवडाभर खेळणार नसल्यामुळे हा सामना खेळवणे देखील शक्य होणार नाही. दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट राइडर्स विरुद्ध 29 एप्रिल रोजी सामना खेळला होता. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 7 गडी राखून जिंकला होता. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT