Team India
Team India PTI
क्रीडा

T20 World Cup: विराट, रोहित नव्हे तर 'या' खेळाडूवर असेल लक्ष!

विराज भागवत

"मोठी स्पर्धा जिंकायची तर 'असा' मॅचविनर संघात हवाच"

T20 World Cup 2021: बहुप्रतिक्षित टी२० विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असले तरी कोरोनाचा धोका लक्षात घेता ही स्पर्धा भारताबाहेर म्हणजेच युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. २४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना रंगणार असून त्या सामन्याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. भारताचा अनुभवी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने या स्पर्धेत कोणत्या तीन खेळाडूंवर अधिक लक्ष असेल, ते सांगितले. त्याने सांगितलेल्या तीन खेळाडूंपैकी केवळ एकच खेळाडू भारतीय आहे. त्याशिवाय, एक खेळाडू ऑस्ट्रेलियाचा तर एक खेळाडू विंडिजचा आहे.

"दिनेश कार्तिकने आपल्या मुलाखतीत सांगितलं की टी२० विश्वचषक स्पर्धेत ज्या तीन खेळाडूंवर लक्ष असेल त्यातील पहिला खेळाडू म्हणजे विंडिजचा निकोलस पूरन. पूरन हा अतिशय स्पेशल खेळाडू आहे. तो जेव्हा त्याचं करियर संपवेल तेव्हा तो खूप जास्त धावा करून निवृत्त होणार खेळाडू असेल. बॅट स्विंग करत फटकेबाजी करणं ही एक कला आहे. ही कला पूरनला खूप चांगल्या पद्धतीने जमते. इतर अनेक खेळाडूंपेक्षा तो दूरवर षटकार खेचू शकतो. विंडिजला चांगली कामगिरी करायची असेल तर त्यासाठी पूरनचा मोठा हातभार आवश्यक आहे", असे कार्तिक म्हणाला.

Hardik Pandya

"या स्पर्धेतील दुसरा महत्त्वाचा खेळाडू असेल मिचेल स्टार्क. तो जर चमकला तर ऑस्ट्रेलियासाठी ही स्पर्धा खूपच उल्लेखनीय ठरेल. ऑस्ट्रेलियासाठी तो महत्त्वाच्या षटकांमध्ये गोलंदाजी करतो. विंडिजविरूद्धच्या वन डे मालिकेत त्याला चांगला सूर गवसला होता. तो चेंडू आत आणि बाहेर वळवण्यास सक्षम आहे. तो वेगवान गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांना बाद करू शकतो. जर ऑस्ट्रेलियाच्या संघाला स्पर्धेत कमाल करून दाखवायची असेल तर मिचेल स्टार्कला चमकदार कामगिरी करावीच लागेल", असं कार्तिकने नमूद केलं.

Dinesh Karthik

"भारतीय संघासाठी जर महत्त्वाचा खेळाडू कोणी असेल तर तो म्हणजे अष्टपैलू हार्दिक पांड्या. माझ्या मते टी २० विश्वचषक स्पर्धेत नजर ठेवावी असा तिसरा खेळाडू तोच आहे. जेव्हा तुम्हाला मोठ्या स्पर्धा जिंकायच्या असतात तेव्हा तुम्हाला असा एखादा मॅचविनर खेळाडू संघात लागतोच. भारतासाठी तो खेळाडू म्हणजे हार्दिक पांड्या. तो संघात असला की गोलंदाजीही करू शकतो आणि फलंदाजीही करू शकतो. महत्त्वाच्या धावा करण्यात त्याचा हातखंडा आहे. बहुतेक गोलंदाजांना थेट मैदानाबाहेर षटकार खेचण्याची क्षमता हार्दिकमध्ये आहे. गोलंदाज म्हणूनही हार्दिक पांड्या खूपच चतूर आणि चाणाक्ष गोलंदाज आहे. त्यामुळे असा खेळाडू संघात असणं कधीही चांगलंच असतं", अशा शब्दात त्याने हार्दिकवर विश्वास व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT