Team India T20 Squad For Sri Lanka Series esakal
क्रीडा

Hardik Pandya : अखेर तो दिवस उजाडला! टीम इंडियात आता हार्दिक नेतृत्व, अनेक वरिष्ठांना निरोपाचा नारळ

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Capetian Team India T20 Squad For Sri Lanka Series : अखेर बीसीसीआयने टी 20 वर्ल्डकपच्या पराभवानंतर नव्या दमाचा टी 20 संघा तयार करण्यास सुरूवात केली. श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याच्या हातात देण्यात आले आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुलसह ऋषभ पंतचा देखील टी 20 संघातून पत्ता कट झाला आहे.

आशिया कपनंतर टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील भारताच्या पदरी निराशा पडली होती. त्याचवेळी भारतीय टी 20 संघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली. अखेर आज श्रीलंका मालिकेपूर्वी बीसीसीआयने भारताचा नवा टी 20 संघ कसा असेल याची झलक दाखवली.

बीसीसीआयने टी 20 संघाचे नेतृत्व पहिल्याच प्रयत्नात गुजरात टायटन्सला आयपीएल टायटल जिंकून देणाऱ्या हार्दिककडे सोपवले. जरी बीसीसीआयने रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली असल्याचे कारण दिले असले तरी ही विश्रांती सक्तीची असून जवळपास या वरिष्ठ खेळाडूंची टी 20 संघातून अघोषित घरवापसी झाली आहे.

दुसरीकडे टी 20 आणि वनडे संघातून ऋषभ पंतचा देखील पत्ता कट झाला असून त्याच्या जागी आता संजू सॅमसन आणि इशांत किशन यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका वर्षापूर्वीच भारतीय संघात पादर्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवला भारतीय टी 20 संघाचे उपकर्णधारपद देऊन त्याच्या कामगिरीचा एकप्रकारे बीसीसीआयने गौरवच केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT