ICC Women's T20I Team of the Year 2022
ICC Women's T20I Team of the Year 2022  esakal
क्रीडा

ICC Women's T20I Team : आयसीसी महिला टी 20 संघात भारताचा डंका; पाकिस्तानची घेतली फक्त दखल

अनिरुद्ध संकपाळ

ICC Women's T20I Team of the Year 2022 : आयसीसीने वर्ष 2022 च्या महिला संघाची घोषणा नुकतीच केली. या संघात भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. ICC Women's T20I Team of the Year 2022 च्या प्लेईंग 11 मध्ये सर्वाधिक भारतीय महिला क्रिकेटपूटंनी स्थान पटकावले.

या संघात तब्बल 4 भारतीय खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचे 3 तर पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेचे प्रत्येकी 1 खेळाडू या संघात आहेत. भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर ICC Women's T20I Team of the Year 2022 मध्ये स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, ऋचा घोष आणि रेणुका सिंह यांचा समावेश आहे.

आयसीसीने आज वर्ष 2022 चा आपला महिला टी 20 संघ घोषित केला. या संघात बेथ मूनी, स्मृती मानधना, सोफी डिवाईन, अॅश गॉर्डनर, ताहिला मॅग्रा, निदान डार, दिप्ती शर्मा, ऋचा घोष, सोफिया एक्लस्टर, इकोना रानाविरा आणि रेणुका सिंह यांचा समावेश आहे.

स्मृती मानधनाने 2022 मध्ये 33 च्या सरासरीने 594 धावा केल्या आहेत. या धावा तिने 133 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. यात 21 डावात 5 अर्धशतके देखील ठोकली आहेत.

(Sports Latest News)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT