ind vs pak devotees bappa shelter
ind vs pak devotees bappa shelter sakal
क्रीडा

Ind vs Pak : भक्त बाप्पाच्या चरणी, भारताच्या विजयासाठी शुभेच्छा देत म्हणाले...

Kiran Mahanavar

Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये आज सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. आशिया कप 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला होता. पाकिस्तानसोबतच्या या सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांनी भारताच्या विजयाच्या शुभेच्छा देत. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला.

भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांनी टीम इंडियाच्या विजयाच्या शुभेच्छा देत. श्रीगणेशाचे दर्शन घेतले आणि त्यांची पूजा केली. लोकांनी भारतीय संघाच्या खेळाडूंचे पोस्टर लावून गणेशाची पूजा केली. टीम इंडियाच्या विजयासाठी त्यांचे आशीर्वाद मागितले. यावेळी तेथील लोकांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तानचा सामना युद्धासारखा आहे. सध्या गणेश चतुर्थीचा मुहूर्त सुरू आहे, अशा स्थितीत विघ्नहर्ताची आरती करून भारताच्या विजयासाठी त्यांच्याकडे आशीर्वाद मागितले आहे.

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. अशा स्थितीत दीपक हुड्डा किंवा अक्षर पटेल यांना स्थान मिळू शकते. संघातील अष्टपैलू खेळाडूंची कामगिरीही महत्त्वाची ठरणार आहे. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप या वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा असतील. अनुभवी भुवनेश्वर भारतासाठी आतापर्यंत निर्णायक ठरला आहे. तर अर्शदीप तरुण आणि प्रतिभावान गोलंदाज आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना त्यांचे सर्वोत्तम देणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT