Ind vs Pak 
क्रीडा

Ind vs Pak : पाकिस्तानला टाईमपास नडला; ICC च्या नियमाचा भारताला फायदा

आयसीसीच्या नव्या नियमामुळे क्रिकेटच्या मैदानात आता विनाकारण वेळ घालवणे महागात पडणार आहे.

Kiran Mahanavar

IND vs PAK Asia Cup 2022 : आयसीसीच्या नव्या नियमामुळे क्रिकेटच्या मैदानात आता विनाकारण वेळ घालवणे महागात पडणार आहे. याचा प्रत्यय भारत-पाकिस्तान यांच्यामधील आशियाई करंडकातील लढतीदरम्यान आला. निर्धारित वेळेत षटक पूर्ण न करता आल्यास उर्वरित षटकांसाठी 30 यार्डच्या वर्तुळामध्ये चारऐवजी पाच क्षेत्ररक्षक ठेवावे लागतात. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. पाकिस्तान व भारत या दोन्ही डावांच्या अखेरच्या षटकांमध्ये दोन्ही संघांना पाच क्षेत्ररक्षक वर्तुळामध्ये ठेवावे लागले होते. मात्र पाकिस्तानपेक्षा भारताला याचा फायदा अधिक झाला आणि अटीतटीच्या लढतीत टीम इंडियाचा संघ विजयी ठरला.

क्रिकेटच्या खेळात आता नियम महत्त्वाचे ठरणार आहेत. षटकांच्या गतीवरून आयसीसी आक्रमक झाली आहे. यामुळे खेळाडूंना शिस्तही लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या लढतीचे टायमिंग वाढणार नाही. सातत्याने चुका करणाऱ्या संघाला शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे भविष्यात क्रिकेट हा खरोखरच जंटलमन खेळ म्हणून ओळखला जाईल.

काय आहे नियम
जानेवारी, 2022 मध्ये आयसीसीकडून नव्या नियमाचा अवलंब करण्यात आला. या नियमानुसार डावाच्या 85 व्या मिनिटाला 20 वे षटक सुरू व्हायला हवे. असे झाले नाही तर त्या डावातील उर्वरित षटकांमध्ये चारऐवजी पाच क्षेत्ररक्षण 30 यार्ड वर्तुळामध्ये ठेवावे लागतात. या वेळी तिसऱ्या पंचांचे वेळेवर लक्ष असते.

काय घडले

- पाकिस्तानचा संघ फलंदाजी करीत असताना : भारतीय गोलंदाज वेळेत षटके टाकण्यात अपयशी ठरले. त्यामुळे अखेरच्या दोन षटकांमध्ये भारताला पाच क्षेत्ररक्षक वर्तुळामध्ये ठेवावे लागले. पाकिस्तानची अवस्था 18 व्या षटकांनंतर 7 बाद 124 धावा अशी झाली होती. पाकिस्तानने अखेरच्या दोन षटकांत 23 धावा फटकावल्या. पाकिस्तानने 18 व्या षटकांपर्यंत जास्त विकेट गमावले होते. त्यामुळे भारताचे अखेरच्या दोन षटकांमध्ये जास्त नुकसान झाले नाही.

- भारतीय संघ फलंदाजी करीत असताना : पाकिस्तानी गोलंदाजांकडून नियम व शिस्त पाळली गेली नाही. त्यामुळे 18, 19 व 20 या तिन्ही षटकांदरम्यान त्यांना पाच क्षेत्ररक्षक वर्तुळामध्ये ठेवावे लागले. भारताने 17 व्या षटकानंतर 4 बाद 116 धावा केल्या होत्या. अखेरच्या तीन षटकांमध्ये भारताला विजयासाठी 32धावांची आवश्‍यकता होती. रवींद्र जडेजाने नसीम शहा टाकत असलेल्या 18 व्या षटकांत 1 चौकार व 1 षटकार मारला. त्यानंतर हार्दिक पंड्याने हारीस रौफ टाकत असलेल्या 19 व्या षटकांत 3 चौकार खेचले. अखेर 20 व्या षटकात मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीवर षटकार मारून हार्दिकने भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळे पाकिस्तानला टाईमपास करणे चांगलेच महागात पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT