Virat_kolhi 
क्रीडा

INDvsNZ : मॅच जिंकल्यावर विराट म्हणाला, '...त्या गोष्टींचा विचार करत बसलो की मन भरटकतं!'

वृत्तसंस्था

ऑकलंड : 'जेटलॅग'बाबत मी बोललोच नव्हतो, तसेच कारणे द्यायला आम्हाला आवडत नाही, ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत त्याचा विचार करत बसलो, तर आपले लक्ष मूळ उद्दिष्टापासून दूर जाते, असे स्पष्ट मत मांडत विराट कोहलीने दोन दिवसांतच येथे दाखल होत मिळवलेल्या विजयावर समाधान व्यक्त केले. अशा प्रकारच्या शानदार विजयाने मालिकेची योग्य सुरुवात होते, असेही तो म्हणाला. 

रविवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळल्यानंतर तेथूनच टीम इंडिया न्यूझीलंडला रवाना झाली. दोन दिवसांपूर्वी येथे आल्यानंतर द्विशतकी धावांचे आव्हान पार करून न्यूझीलंडमध्ये आत्तापर्यंतचा केवळ दुसरा विजय मिळवला. दोन मालिकांमध्ये प्रवास आणि विश्रांतीसाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे विराटने काल सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना दौरा कार्यक्रमावर टीका केली होती. 

बंगळूर-ऑकलंड प्रवास त्यानंतर लगेचच सामना आणि त्यात विजय एकूणच या घटनाक्रमाचा आम्ही आनंद घेतला. आत्मविश्‍वास मिळवून देणाऱ्या या विजयाने न्यूझीलंडमधील मालिकेला चांगली सुरुवात झाली. सामना ऑकलंडला असला तरी 80 टक्के प्रेक्षक भारतीय होते आणि त्यांचा पाठिबा 200 पेक्षा अधिक धावांचे आव्हान पार करायला मोलाचा ठरला, असे विराटने सामन्यानंतर सांगितले. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर पुढचे दोन सामने जिंकत भारताने मालिका 2-1 अशी जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून मिळालेल्या आत्मविश्‍वासाचा आम्हाला येथे फायदा झाला. फलंदाजीस उपयुक्त असलेली खेळपट्टी आणि जवळ असलेली सीमारेषा यामुळे गोलंदाजांना दोष देणे योग्य नाही. तरीही आम्ही न्यूझीलंडला दोनशे धावांच्या जवळपास रोखले. त्यांची सुरुवातीची फलंदाजी पाहिली तर 230 धावा आम्ही अपेक्षित केल्या होत्या, असे विराट म्हणाला. 

क्षेत्ररक्षणात सुधारणा हवी 

अजूनही आम्हाला क्षेत्ररक्षणात सुधारणा करणे आवश्‍यक आहे. येथील स्टेडियम आयताकृती असल्यामुळे सीमारेषांवर वेगळ्या प्रकारचे कोन तयार होतात, अशा ठिकाणी चेंडू अडवणे आव्हानात्मक असते. त्याची सवय करून घ्यावी लागेल, असे कोहलीने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाच्या आतूनच काही सूत्रं आम्हाला माहिती पुरवू लागले

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT