ajinkya rahane lyon.png 
क्रीडा

INDvsAUS: ब्रिस्बेनमधील विजयानंतर रहाणेने नॅथन लॉयनला दिली खास भेट, पाहा VIDEO

सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- ऑस्ट्रेलियाविरोधात ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर टीम इंडियाचे जगभरातून कौतुक केले जात आहे. टीमने ब्रिस्बेन कसोटीत विजय मिळवत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करुन बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. ब्रिस्बेन कसोटी सामना ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन लायनसाठीही खास होता. हा त्याचा 100 वा कसोटी सामना होता. विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने स्वतःची स्वाक्षरी असलेली जर्सी नॅथनला भेट दिली. 

ब्रिस्बेनमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका पुन्हा एकदा आपल्या नावे केली. सामन्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणने 100 वा कसोटी सामना खेळत असलेला ऑस्ट्रेलियन स्पिनर नॅथन लॉयनला स्वतःची सही असलेली जर्सी भेट दिली. नॅथनच्या 100 व्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाकडून स्वाक्षरी असलेली जर्सी देत आहे, असे टी शर्ट देताना रहाणे म्हणाला. नॅथनने 100 कसोटीत 399 विकेट घेतल्या आहेत. त्याला या कसोटीत 400 विकेट घेण्याची संधी होती. 

टीम इंडियाच्या या खिलाडीवृत्तीचे कौतुक माजी कसोटीपटू व्हीव्हीएसएस लक्ष्मण यांनीही केले आहे. नॅथनच्या 100 कसोटीनिमित्त एक खास भेट देऊन टीम इंडियाने खेळाप्रतीची एक चांगली भावना दाखवली आहे. खिलाडीवृत्तीचे हे एक शानदार उदाहरण आहे, असे लक्ष्मण यांनी म्हटले आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर मालिकेत जबरदस्त पुनरागमन केले. त्यामुळे टीम इंडियासाठी हा विजय खूप खास आहे. टीम इंडियाचे अनेक प्रमुख खेळाडू जायबंदी असल्यामुळे संघाबाहेर असतानाही मोठा विजय मिळवला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT