IPL 2021 File Photo
क्रीडा

IPL 2021:उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून; दसऱ्या दिवशी फायनल?

जैवसुरक्षित वातावरणात खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेत सहभागी काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली.

सुशांत जाधव

IPL 2021 Resume In UAE : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील उर्वरित सामने UAE च्या मैदानात रंगणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. उर्वरित स्पर्धा सप्टेंबरपासून सुरुवात होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. आता तारखांच्या संदर्भात चर्चेला उधाण आले आहे. 19 उर्वरित स्पर्धेला सुरुवात होणार असून दसऱ्याच्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबरला फायनल सामना खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. बीसीसीआयकडून मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

29 सामन्यानंतर 4 मे रोजी भारतात रंगलेली स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली होती. जैवसुरक्षित वातावरणात खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेत सहभागी काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली. आता स्पर्धेतील उर्वरित सामने युएईत घेण्यात येणार आहेत. 2014 मध्ये आयपील स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने युएईच्या मैदानात रंगले होते. त्यानंतर 2020 च्या हंगामातील संपूर्ण स्पर्धा युएईत झाली होती. तिसऱ्यांदा पुन्हा एकदा युएईच्या मैदानात आयपीएलचे वारे वाहताना दिसणार आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय उर्वरित सामने 25 दिवसांत संपवण्याचा प्लॅन आखत आहे. युएई क्रिकेट बोर्डासोबत यासंदर्भात सकारात्मक चर्चा झालीये. बीसीसीआयच्या सर्वसाधारण बैठकीपूर्वीच युएई क्रिकेट बोर्डाने उर्वरित सामने युएईमध्ये घेण्याची परवानगी दिली होती. मागील आठवड्यात त्याच्यावर अंतिम निर्णय झाला. 19 सप्टेंबरापासून उर्वरित सामन्याला सुरुवात होणार असून शारजहा, दुबई आणि अबुधाबीच्या मैदानात सामने खेळवण्यात येणार आहेत, असे संकेतही त्यांनी दिले.

उर्वरित सामन्यात परदेशी खेळाडूंच्या सहभागासंदर्भातही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की. वेगवेगळ्या क्रिकेट बोर्डांशी यासंदर्भात चर्चा सुरु आहे. सध्याच्या घडीला आम्हाला चांगला प्रतिसादही मिळत असून बऱ्यापैकी परदेशी खेळाडून उर्वरित सामन्यासाठी उपलब्ध होतील. जे खेळाडू उपलब्ध होणार नाहीत त्यांच्यासंदर्भात काय निर्णय घ्यायचा ते नंतर ठरवले जाईल, असेही ते म्हणाले.

दिल्ली कॅपिटल्स 12 पॉइंटसह अव्वल

स्पर्धा स्थगित झाली त्यावेळी रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा संघ 8 पैकी 6 सामन्यांतील विजयासह 12 गुण मिळवून टॉपला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Romance Scam : ऑनलाइन प्रेम की गोड विष? 'I Love You' म्हणून रिकामं करत आहेत बँक अकाऊंट; रोमॅन्स स्कॅमचं 'ते' सत्य तुम्हाला रडवून टाकेल

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT