Mumbai Indians 
IPL

आठवतंय का? सलग 5 पराभवानंतरही MI नं गाठली होती प्ले ऑफ

अजूनही ते काहीतरी पराक्रम करुन दाखवतील, अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांना असेल.

सुशांत जाधव

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक पाच वेळा जेतेपद पटकलेल्या मुंबई इंडियन्सची गाडी पटरीवरुन घसरलीये. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर त्यांच्यासमोर आता प्ले ऑफमध्ये टिकून राहण्याची मोठं आव्हान उभे राहिले आहे. काहींनी तर मुंबई इंडियन्सचा प्रवास संपला असेही ठरवले आहे. मुंबई इंडियन्सला धक्क्यातून सावरायचं माहित आहे. त्यामुळेच अजूनही ते काहीतरी पराक्रम करुन दाखवतील, अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांना असेल.

सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा ज्या अडचणीत सापडला आहे ते पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांना युएईच्या मैदानात रंगलेल्या 2014 च्या हंगामाची आठवणही झाली असेल. त्यावेळीचं गणित यावेळीपेक्षा थोडं उलट होते. देशातील निवडणुंकांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामने युएईच्या मैदानात खेळवण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्सचा संघ युएईच्या मैदानात पाच सामने खेळला. कोलकाता, बंगळुरु, चेन्नई, दिल्ली आणि हैदराबाद यांनी लागोपाठ मुंबई इंडियन्सला पराभवाचे धक्के दिले.

सलग पाच पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरेल का? असा प्रश्न उपस्थितीत झाला. त्यावेळीही अनेकांना हे शक्य नाही, असेच म्हटले होते. पण उर्वरित 9 सामन्यातील 7 सामन्यातील विजयासह मुंबई इंडियन्सने 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहत टप्ले ऑफ'मध्ये स्थान पक्के केले होते. एलिमेनेटर सामन्यातील लढतीत चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला पराभूत केले. चेन्नईचा प्रवासही त्यानंतर संपुष्टात आला होता. या हंगामात कोलकाता नाईट रायजडर्सने पंजाब किंग्जला पराभूत करत जेतेपद पटकावले होते.

सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित दोन सामने जिंकायचे आहेत. यातील पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर ते हैदराबादशी भिडणार आहेत. मुंबईसोबतच कोलकाता आणि राजस्थान या दोन्ही संघांना 14 गुणांपर्यंत पोहचणे शक्य आहे. मुंबई कमाल करणार की राजस्थान रॉयल खेळी करुन त्यांचे मार्ग बंद करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT