IPL 2024 Playoffs Teams News Marathi sakal
IPL

IPL 2024 Playoffs Scenario : RCB नंतर 'ही' टीम पण IPL मधून बाहेर... मुंबई-दिल्लीवरही टांगती तलवार? जाणून घ्या समीकरण

IPL 2024 Playoffs Scenario : आयपीएल 2024 च्या हंगामाची उलटी गिनती आता सुरू झाली आहे. आणि प्लेऑफची शर्यत पण रंगतदार झाली आहे.

Kiran Mahanavar

IPL 2024 Playoffs Scenario : आयपीएल 2024 च्या हंगामाची उलटी गिनती आता सुरू झाली आहे. आणि प्लेऑफची शर्यत पण रंगतदार झाली आहे. यामध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ खूप पुढे आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान आता 14 गुणांसह प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे.

आता फक्त एक विजय आणि राजस्थानला प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळू शकते. पण या सगळ्यात 4 संघ आहेत जे गुणतालिकेत तळाशी आहेत. आणि आता त्यांना प्ले ऑफमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. यापैकी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था सर्वात वाईट आहे.

तर पंजाब किंग्जची अवस्थाही जवळपास आरसीबीसारखीच आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी आता सर्व सामने करो या मरो सारखे आहेत. जर हे संघ 1-2 सामने हरले तर ते बाहेरही होऊ शकतात.

या हंगामात विराट कोहलीचा संघ आरसीबीने आतापर्यंत 8 पैकी 7 सामने गमावले आहेत. आणि सध्या गुणतालिकेत तळाच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने उर्वरित सर्व 6 सामने जिंकले तर त्याचे एकूण 14 गुण होतील. अशा परिस्थितीत आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचणे पूर्णपणे अशक्य दिसत आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे 2022 च्या हंगामापासून 10 संघ आयपीएलमध्ये खेळत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत कोणताही संघ 14 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचू शकलेला नाही. अशा स्थितीत आरसीबी संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी दिसते.

पण आरसीबीला चमत्कार नक्कीच हवा आहे. जर उर्वरित संघ त्यांचे सामने गमावले आणि चौथ्या स्थानावरील संघाचे समीकरण 14 गुणांवर आले, तर आरसीबीला काही आशा असू शकतात. त्यासाठीही आरसीबीला आपले उर्वरित सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागतील आणि नेट रनरेट चांगला राखावा लागेल. मात्र याबाबत फार कमी आशा असल्याचे दिसते.

दुसरीकडे, शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जसाठी ही करो या मरो अशी परिस्थिती आहे. हा संघ 8 पैकी 2 सामने जिंकून गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. या संघाला उर्वरित सर्व 6 सामने जिंकायचे असतील तर 16 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे समीकरण होईल.

पण आता हा संघ एकही सामना हरला तर आरसीबीसारखी परिस्थिती निर्माण होईल. म्हणजेच प्लेऑफच्या शर्यतीतून ते जवळपास बाहेरच होणार आहे. मग चमत्काराची आशा असेल. पंजाबला अजूनही चेन्नईविरुद्ध २ सामने आणि राजस्थान आणि हैदराबादविरुद्ध प्रत्येकी १ सामना खेळायचा आहे. अशा स्थितीत हे संघ पंजाबचे गणित बिघडू शकतात.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाची आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाची अवस्था सारखीच आहे. दोन्ही संघांचे 6-6 सामने बाकी आहेत. जर दोन्ही संघांनी त्यांचे सर्व सामने जिंकले तर ते 18 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करतील. पण हे शक्य नाही, कारण या दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध सामना खेळायचा आहे, ज्यामध्ये त्यांच्यापैकी एकाचा पराभव निश्चित आहे.

मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांनी आणखी 1-1 सामने गमावले, तरीही त्यांना 16 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. पण दोन्ही संघ 2-2 सामने गमावले तर आरसीबीसारखी परिस्थिती होईल. म्हणजेच ते प्लेऑफमधून जवळपास बाहेर होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT