Hardik Pandya
Hardik Pandya Sakal
IPL

Hardik Pandya: टी20 वर्ल्डकपपूर्वीच हार्दिकचा विक पॉइंट सापडला? तीन डावात दोनदा 'या' चेंडूवर झालाय बाद

प्रणाली कोद्रे

Hardik Pandya: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता स्पर्धा रोमांचक वळणावर आली आहे. प्रत्येक संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्यादृष्टीने प्रयत्न करत आहे. अशात काही संघांना प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे, या संघांमध्ये 5 वेळचा विजेता मुंबई इंडियन्सचाही समावेश आहे.

मुंबईला यंदा त्यांच्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. तसेच मुंबईला सध्या संघाच्या कामगिरीबरोबरच नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या फॉर्मचीही चिंता आहे. खरंतर आगामी टी२० वर्ल्डकपच्या दृष्टीने हार्दिकच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष आहे.

ऑक्टोबर २०२३ मध्ये वनडे वर्ल्डकपमध्ये दुखापतग्रस्त झाल्यानंतर जवळपास मार्च २०२४ पर्यंत हार्दिक क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्यातच त्याला आयपीएल २०२४ पूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्यात आले. त्यामुळे हार्दिक आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.

मात्र अद्यापतरी मुंबईच्या ८ सामन्यांनंतरही हार्दिकला वैयक्तिक कामगिरीने छाप पाडता आलेली नाही.

हार्दिकने 8 सामन्यांत अवघ्या 21.57 च्या सरासरीने आणि 142.54 च्या स्ट्राईक रेटने 151 धावा केल्या आहेत. 39 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. त्याचबरोबर गोलंदाजीतही त्याला कमाल करता आलेली नाही. त्याने 8 सामन्यांत केवळ 4 विकेट्स घेतल्या आहेत.

हार्दिकची कमजोरी आली समोर?

याचदरम्यान हार्दिकला कोणता चेंडू त्रस्त करत आहे, याबद्दलची एक आकडेवारीही समोर आली आहे. हार्दिक यंदाच्या आयपीएलमध्ये फुलटॉस चेंडू खेळताना काहीसा अडखळताना दिसला आहे.

त्याने 8 सामन्यांतील 3 डावात 4 फुलटॉस चेंडूंचा सामना केला असून चारच धावा केल्या आहेत. तसेच त्याची केवळ 2 सरासरी आहे. तो 3 डावात दोनवेळा फुलटॉसवर बाद झाला आहे.

एकूणच ही आकडेवारी फक्त मुंबई इंडियन्सचेच नाही, तर भारतीय संघाचेही टेंशन वाढवणारी आहे. कारण जर हार्दिकला आगामी टी20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात संधी मिळाली, तर फुलटॉस चेंडू त्याच्याविरुद्ध प्रतिस्पर्ध्यांसाठी एक अस्त्र ठरू शकते.

कारण टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजला होणार आहे. तिथे वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या असण्याची शक्यता आहे.

टी20 वर्ल्डकप 2 जून पासून 29 जूनपर्यंत खेळवला जाणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला होणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार असून 1 मेपर्यंत प्राथमिक संघ घोषित करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे एप्रिलच्या अखेरीस भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT